शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याने दोन महिलांना दिली विधानसभेत जाण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा प्रभाराव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) कडून मैदानात उतरल्या.

ठळक मुद्देपुलगाव मतदारसंघातूनच मिळाले प्रतिनिधित्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून वर्धा जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये दोन महिलांना मतदारांनी विधानसभेत जाण्याची संधी दिली. त्यांनी या जिल्ह्याचे नेतृत्व करीत आपली राजकारणावर छाप सोडली. १९७२ च्या निवडणुकीत पुलगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर प्रभाराव पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. यावेळी त्यांची लढत अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवारासोबत झाली.प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा प्रभाराव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (अर्स) कडून मैदानात उतरल्या. या निवडणुकीत त्यांचा माणिकराव महादेव सबाने यांनी पराभव केला. माणिकराव सबाने भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस (इं) चे उमेदवार होते. प्रभाराव यांना १३ हजार ७२५ तर माणिकराव सबाने यांना ४१ हजार ६२६ मते मिळाली. त्यानंतर १९८५ ला पुन्हा पुलगाव मतदारसंघातून प्रभाराव मैदानात उतरल्या.या निवडणुकीत प्रभाराव यांनी कॉँग्रेस (एस)चे वसंतराव कार्लेकर यांचा पराभव केला. प्रभाराव यांना ३९ हजार ४१९ मते होती , तर कार्लेकर यांना १९ हजार ९०९ मते मिळाली. त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत पुन्हा प्रभाराव रिंगणात उतरल्या. मात्र, या निवडणुकीत जनता दलाच्या सरोज काशीकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा प्रभा राव भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसकडून निवडून आल्या. त्यावेळी प्रभाराव यांनी ४३ हजार १४८ मते मिळाली. या निवडणुकीत सुरेश बापूराव देशमुख यांनी अपक्ष झुंज दिली. त्यांना २५ हजार ५९७ तर सरोज काशीकर यांना २२ हजार ३८२ मते मिळाली. प्रभाराव निवडून आल्यात. ही प्रभाराव यांची ही शेवटची निवडणूक ठरली. वर्धा जिल्ह्यातून एकट्या पुलगाव मतदारसंघातूनच प्रभाराव व सरोज काशीकर या दोन महिलांना विधानसभेत जाण्याची संधी मतदारांनी दिली.चारही मतदारसंघांमध्ये लढल्या अनेक महिला उमेदवारवर्धा- विधानसभा, लोकसभेत महिलांसाठी कुठलेही आरक्षण नसताना जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात अनेक महिलांनी अपक्ष निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवून दिले. कॉँग्रेसकडून लढणाऱ्या प्रभाराव तीनवेळी पुलगाव मतदारसंघातून विजयी झाल्यात, तर याच मतदारसंघातून एकदा मतदारांनी सरोज काशीकर यांना संधी दिली. १९८५ मध्ये पुलगाव मतदारसंघातून निर्मला राजेंद्रप्रसाद पाठक यांनी निवडणूक लढविली. याशिवाय १९९० मध्येच वर्धा मतदारसंघातून सुमित्रा नारायण चिडाम या महिलेनीही निवडणूक लढविली. तसेच हिंगणघाट मतदारसंघातून ललिता मधुसूदन कटारिया यांनीही निवडणूक लढविली. आर्वी मतदारसंघातून याच निवडणुकीत ज्योती विजय खोंडे यांनीही निवडणूक लढविली. १९९५ मध्ये देवळी मतदारसंघात प्रभा राव व सरोज काशीकर या दोन उमेदवार मैदानात होत्या. १९९९ च्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून कांता देवराव नैताम यांनी तर याच मतदारसंघात सुशीलाबाई राधेश्याम सराफ यांनीही निवडणूक लढविली. हिंगणघाट मतदारसंघात प्रभाताई सुरेश रघाटाटे, शांताबाई महादेव शेंडे या दोन महिला रिंगणात होत्या. पुलगाव मतदारसंघात कौशल्याबाई पोपेश्वर गजभिये यांनी निवडणूक लढविली. २००४ मध्ये हिंगणघाट मतदारसंघात प्रा. सुरेखा अशोक देशमुख यांनी निवडणूक लढविली तर पुलगाव मतदारसंघातून चंद्रकला सिद्धार्थ डोईफोडे, सरोज काशीकर, सिमंतीनी रामभाऊ हातेकर यांनी निवडणूक लढविली. याशिवाय वर्धा मतदारसंघातून मंदा बाबाराव कोंबे, सुनीता भाष्कर इथापे यांनी निवडणूक लढविली. २००९ मध्ये आर्वी मतदारसंघातून प्रिया अशोक शिंदे तर देवळी मतदारसंघातून शोभा विश्वनाथ पोपटकर या निवडणूक लढल्या. २०१४ मध्ये हिंगणघाट मतदारसंघातून लता नरहरी थूल व उषाकिरण अरूण थुटे यांनी वर्धा जिल्ह्यातून निवडणूक लढविली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019