शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

By admin | Updated: May 10, 2014 02:35 IST

अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या एक महिन्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अंगणवाडी सेविकेचा मानधनात राज्यशासनाने ९५० रुपये मदतनिस व ...

 वर्धा : अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या एक महिन्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अंगणवाडी सेविकेचा मानधनात राज्यशासनाने ९५० रुपये मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात ५५० रुपयांची वाढ करण्याचा आदेश दिले. परंतु ही वाढ नगन्य असून त्यात आणखी वाढ करण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक समस्या प्रलंबित असून त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. १ एप्रिल २०१४ पासून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. परंतु हे वाढीव मानधनही अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी अत्यंत तुटपुंजे आहे. महागाईच्या काळात इतक्या कमी मानधनावर कुटुंब चालविणे सोपे नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये व मदतनिसला सात हजार पाचशे रुपये मानधन मिळण्यासाठी जून महिन्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते प्रा. राजू गोरडे, किशोर चिमुरकर, हसीना गोरडे, विजया पावडे, मैना उईके, वंदना कोलनकर, सुजाता शंभरकर, शबाना शेख, माला भगत, वंदना बाचले, रेखा पाटील, वंदना झाडे, रेखा कोठेकर, सुनिता भगत, रत्नमाला साखरकर, आशा गळहाट, यमुना नगराळे, छाया ढोक, विमल कौरती, शोभा तिवारी, नाहीदा शेख, आशा लवणकर, ज्योती कुळकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी दिला आहे. जिल्ह्यात जवळपास १९ अंगणवाडीसेविका व मदतनीस सेवानिवृत्त झाल्या आहेत. पेंशनचा आदेश, आरोग्य सुविधा व उन्हाळ्याच्या रजेचा आदेश अजूनही महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. जिल्ह्यात ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत सलग आंदोलन पार पडले. तरीही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या, वेदना व भावना समजून घेल्या नाहीत. महिलाना सक्षम करणार, त्यांना न्याय देणार अशा घोषणा देण्याचे व खोटा प्रचार करण्याचे काम पुढारी करतात. अंगणवाडी सेविका व मदतनीस कुशल कामगार आहेत. तरीही त्यांना महिलांच्या सक्षमीकरण करण्याच्या गप्पा मारणारे महाराष्ट्र सरकार किमान वेतनाप्रमाणे मानधन दरमहा देत नाही. मिटिंग भत्ता व प्रवास भत्त्याची बिले दोन वर्ष लोटतात तरीही दिल्या जात नाही. त्यांचा भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही. कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. एल.आय.सी. हप्ते त्यांच्या मानधनातून कापल्या जात नाही. लहान मुलांना अत्यंत निकृष्ट आहाराचा पुरवठा केला जातो. किशोरी मुलींना सकस, चांगल्या आहाराचा पुरवठा केल्या जात नाही. राज्य सरकारने महिला बालकल्याण विभाग वाळीत टाकला आहे, असा आरोप कामगार नेते राजू गोरडे यांनी केला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणीही करण्यात येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)