शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

By admin | Updated: May 10, 2014 02:35 IST

अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या एक महिन्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अंगणवाडी सेविकेचा मानधनात राज्यशासनाने ९५० रुपये मदतनिस व ...

 वर्धा : अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या एक महिन्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अंगणवाडी सेविकेचा मानधनात राज्यशासनाने ९५० रुपये मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात ५५० रुपयांची वाढ करण्याचा आदेश दिले. परंतु ही वाढ नगन्य असून त्यात आणखी वाढ करण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक समस्या प्रलंबित असून त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. १ एप्रिल २०१४ पासून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. परंतु हे वाढीव मानधनही अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी अत्यंत तुटपुंजे आहे. महागाईच्या काळात इतक्या कमी मानधनावर कुटुंब चालविणे सोपे नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये व मदतनिसला सात हजार पाचशे रुपये मानधन मिळण्यासाठी जून महिन्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते प्रा. राजू गोरडे, किशोर चिमुरकर, हसीना गोरडे, विजया पावडे, मैना उईके, वंदना कोलनकर, सुजाता शंभरकर, शबाना शेख, माला भगत, वंदना बाचले, रेखा पाटील, वंदना झाडे, रेखा कोठेकर, सुनिता भगत, रत्नमाला साखरकर, आशा गळहाट, यमुना नगराळे, छाया ढोक, विमल कौरती, शोभा तिवारी, नाहीदा शेख, आशा लवणकर, ज्योती कुळकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी दिला आहे. जिल्ह्यात जवळपास १९ अंगणवाडीसेविका व मदतनीस सेवानिवृत्त झाल्या आहेत. पेंशनचा आदेश, आरोग्य सुविधा व उन्हाळ्याच्या रजेचा आदेश अजूनही महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. जिल्ह्यात ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत सलग आंदोलन पार पडले. तरीही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या, वेदना व भावना समजून घेल्या नाहीत. महिलाना सक्षम करणार, त्यांना न्याय देणार अशा घोषणा देण्याचे व खोटा प्रचार करण्याचे काम पुढारी करतात. अंगणवाडी सेविका व मदतनीस कुशल कामगार आहेत. तरीही त्यांना महिलांच्या सक्षमीकरण करण्याच्या गप्पा मारणारे महाराष्ट्र सरकार किमान वेतनाप्रमाणे मानधन दरमहा देत नाही. मिटिंग भत्ता व प्रवास भत्त्याची बिले दोन वर्ष लोटतात तरीही दिल्या जात नाही. त्यांचा भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही. कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. एल.आय.सी. हप्ते त्यांच्या मानधनातून कापल्या जात नाही. लहान मुलांना अत्यंत निकृष्ट आहाराचा पुरवठा केला जातो. किशोरी मुलींना सकस, चांगल्या आहाराचा पुरवठा केल्या जात नाही. राज्य सरकारने महिला बालकल्याण विभाग वाळीत टाकला आहे, असा आरोप कामगार नेते राजू गोरडे यांनी केला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणीही करण्यात येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)