शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग बळावताहेत; प्रतिबंधक उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते.

ठळक मुद्देडॉ. सचिन ओंबासे : ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांना पत्राद्वारे दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये साथरोगाचे प्रमाण वाढले असून डेंग्यूचेही रुग्ण आढळून आले आहे. तेव्हा या आजाराने आणखी पाय पसरण्यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांना दिल्या आहे. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनही कामाला लागले आहे.जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या मादीपासून याचा प्रसार होतो. हा डास घरात किंवा घराभोवती साठवलेल्या पाण्यात वाढतो.पाणी साठविलेली उघडी भांडी, रांजण, ड्रम, घराभोवती पडलेल्या निरुपयोगी वस्तू, खराब टायर्स, नारळाच्या क रवंट्या, प्लास्टिक बाटल्या, बाटल्यांची टोपणे, चहाचे डिस्पोजेबल कप, डबे, कुंड्या, जुन्या पध्दतीचे कुलर्स इत्यादी ठिकाणी आढळून येतो. हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे डासांचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता दक्षता व स्वच्छता हीच उपाययोजना असून सर्व ग्रामपंचायतीसह नागरिकांनीही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्राव्दारे कळविले आहे.ग्रामीण भागात सर्व उपाययोजना करतांना गावकऱ्यांना यासंदर्भात अवगत करावे व अंमलबजावणी करुन त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहे.या उपाययोजना राबविण्यास झाली सुरुवातपरिसर स्वच्छ करावा तसेच पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू ठेऊ नये. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्याने दिवसभर अंगभर कपडे घालावे. पाण्याची भांडी झाकून ठेवावी. घरातील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. आठवड्यात दर शनिवारला कोरडा दिवस पाळावा.परिसरातील डबकी वाहती करावी किंवा बुजवावी. मोठ्या डबक्यात डास भक्षक गप्पी मासे सोडावेत, साचलेल्या पाण्यात क्रुड आॅईल किंवा रॉकेल टाकावेत. गावातील शेणखताच्या ढिगाºयाचे योग्य व्यवस्थापन करावे, शक्य होत असल्यास गावापासून ५०० मीटर अंतरावर हलवावे व प्रत्येक गावामध्ये डासांची घनता कमी करण्यासाठी नियमीत धुरळणी करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सgram panchayatग्राम पंचायत