शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बंद एटीएम व ‘नो कॅश’ ने ग्राहक त्रस्त

By admin | Updated: May 18, 2017 00:37 IST

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत परिसरातील हजारो लोकांचे खाते आहे. या परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव

लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत परिसरातील हजारो लोकांचे खाते आहे. या परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव ही शाखा असल्याने ग्राहकांना येथून व्यवहार करावे लागतात . मात्र बँकेत रोखेचा तुटवडा असल्याने ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील को-आॅॅपरेटीव्ह बँकेची शाखा बंद झाल्याने या बँकेवर अधिक भार वाढला आहे. त्यामुळे खातेदारांना ठराविक रक्कम दिली जात आहे. परिसरातील शेतकरी, बचत गट, कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी यांचे खाते याच बँकेत आहे. येथे रोखेची कमतरता ही नित्याचीच बाब झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनंतर येथे नव्यानेच एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मात्र एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांच्या अडचनीत भर पडत आहे. एकीकडे बँकेने ठराविक रक्कमेचा विड्रॉल देणे सुरू केले. ग्राहकांना कधी तर रोख न घेताच परतावे लागते. काही ग्राहकांना एटीएम काढण्यास अडचण निर्माण आर्थिक व्यवहार कसा करावा याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक व्यवस्थापक चेकचा वापर करा, असा आदेश देतात. रोखरहीत व्यवहार करण्यावर भर देण्यात येत असला तरी येथे तशा सुविधा नसल्याने ग्राहकांची गोची होत आहे. शेतकऱ्यांना आता नव्याने कर्ज ह्जायचे असल्याने बँकेत गर्दी होत आहे. एटीएम देताना बँक व्यवस्थापनाकडून अनेक नियम लावण्यात आल्याने ग्राहकांची फजिती होत आहे.