शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

By आनंद इंगोले | Updated: August 30, 2023 17:35 IST

रक्षाबंधनाच्या दिवशी घडला अनर्थ : पिपरी (मेघे) गावातील घटना

वर्धा : देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलविण्याकरिता तिघे मंदिरावर चढले. लोखंडी पाईपमध्ये असलेल्या या झेड्याचे संतुलन जावून तो झेंडा लगतच्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने तिघेही खाली फेकल्या गेले. यात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शहरालगतच्या पिपरी (मेघे) येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.

अशोक विठोबा सावरकर (५६), सुरेश भाष्कर झिले (३५) व अशोक उर्फ बाळू नारायणसिंग शेर (६०) सर्व राहणार पिपरी (मेघे) असे मृतांची नावे आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर पिपरी (मेघे) येथे नव्यानेच देवीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. आज रक्षाबंधनानिमित्त या मंदिरावर लोखंडी पाईपमध्ये असलेला झेंडा बदलविण्याकरिता हे तिघेही मंदिरावर चढले होते.

मंदिरावरील झेंडा बदलविताना लोखंडी पाईप असंतुलीत होऊन मंदिरालगत गेलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत वाहिन्यावर पडला. त्यामुळे पाईपमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने तिघांना जबर झकटा बसून तिघेही मंदिराच्या शेडवर फेकल्या गेले. यात तिघांना गंभीर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे गाव शोकसागरात बुडाले.  घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाºयांनी भेट देत चौकशी केली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली.

दोघांवर एकावेळी झाले अंत्यसंस्कार

मृत अशोक विठोबा सावरकर हे ग्रामपंचायत कर्मचारी तर सुरेश भाष्कर झिले हे शिक्षा मंडळचे कर्मचारी असून ते त्यांच्या शेतीची जबाबदारी सांभाळायचे तर अशोक उर्फ बाळू शेर हे शेतकरी होते, अशी माहिती गावकºयांनी दिली. झिले यांचे मुळ गाव नागपूर जिल्ह्यातील बेला असल्याने त्यांचा मृतदेह बेला येथे पाठविण्यात आला. तर अशोक सावरकर आणि बाळू शेर या दोघांवर एकाचवेळी पिपरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

सणाच्या दिवशी गावात भयान शांतता

आज रक्षाबंधन असल्याने कालपासूनच या सणाची गावामध्ये लगबग सुरु होती. शाळांना सुटी असल्याने गावामध्ये या सणानिमित्त मोठा उत्साह असून प्रत्येक घरांमध्ये जोरदार तयारी सुरु होती. परंतु सकाळी साडेआठ वाजता या दुदैवी घटनेत तिघांचा जीव गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. गावातील नागरिकांनी हातचे काम सोडून मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर गावामध्ये दिवसभर भयान शांतता होती. अनेक घरातील चुलीही पेटल्या नसून सर्वांनीही हळहळ व्यक्त केली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह मिळाल्यावर दोघांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूwardha-acवर्धा