शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

By आनंद इंगोले | Updated: August 30, 2023 17:35 IST

रक्षाबंधनाच्या दिवशी घडला अनर्थ : पिपरी (मेघे) गावातील घटना

वर्धा : देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलविण्याकरिता तिघे मंदिरावर चढले. लोखंडी पाईपमध्ये असलेल्या या झेड्याचे संतुलन जावून तो झेंडा लगतच्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने तिघेही खाली फेकल्या गेले. यात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शहरालगतच्या पिपरी (मेघे) येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.

अशोक विठोबा सावरकर (५६), सुरेश भाष्कर झिले (३५) व अशोक उर्फ बाळू नारायणसिंग शेर (६०) सर्व राहणार पिपरी (मेघे) असे मृतांची नावे आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर पिपरी (मेघे) येथे नव्यानेच देवीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. आज रक्षाबंधनानिमित्त या मंदिरावर लोखंडी पाईपमध्ये असलेला झेंडा बदलविण्याकरिता हे तिघेही मंदिरावर चढले होते.

मंदिरावरील झेंडा बदलविताना लोखंडी पाईप असंतुलीत होऊन मंदिरालगत गेलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत वाहिन्यावर पडला. त्यामुळे पाईपमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने तिघांना जबर झकटा बसून तिघेही मंदिराच्या शेडवर फेकल्या गेले. यात तिघांना गंभीर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे गाव शोकसागरात बुडाले.  घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाºयांनी भेट देत चौकशी केली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली.

दोघांवर एकावेळी झाले अंत्यसंस्कार

मृत अशोक विठोबा सावरकर हे ग्रामपंचायत कर्मचारी तर सुरेश भाष्कर झिले हे शिक्षा मंडळचे कर्मचारी असून ते त्यांच्या शेतीची जबाबदारी सांभाळायचे तर अशोक उर्फ बाळू शेर हे शेतकरी होते, अशी माहिती गावकºयांनी दिली. झिले यांचे मुळ गाव नागपूर जिल्ह्यातील बेला असल्याने त्यांचा मृतदेह बेला येथे पाठविण्यात आला. तर अशोक सावरकर आणि बाळू शेर या दोघांवर एकाचवेळी पिपरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

सणाच्या दिवशी गावात भयान शांतता

आज रक्षाबंधन असल्याने कालपासूनच या सणाची गावामध्ये लगबग सुरु होती. शाळांना सुटी असल्याने गावामध्ये या सणानिमित्त मोठा उत्साह असून प्रत्येक घरांमध्ये जोरदार तयारी सुरु होती. परंतु सकाळी साडेआठ वाजता या दुदैवी घटनेत तिघांचा जीव गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. गावातील नागरिकांनी हातचे काम सोडून मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर गावामध्ये दिवसभर भयान शांतता होती. अनेक घरातील चुलीही पेटल्या नसून सर्वांनीही हळहळ व्यक्त केली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह मिळाल्यावर दोघांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूwardha-acवर्धा