शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

क्षमता १५०० ची, प्रत्यक्ष लाभ २५० हेक्टरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते;....

ठळक मुद्देमदन उन्नई धरणाच्या कालव्यांना गळती

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते; पण फुटलेल्या पाटचऱ्या, वाढलेली झुडपे तसेच कालव्यांना पडलेले तडे यामुळे प्रत्यक्षात २००-२५० हेक्टर शेती कशीबशी सिंचनाखाली आली असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने मदन उन्नई धरणाची पाणी पातळी पाहिजे तशी वाढली नाही. अशात एक उद्योग कंपनी दिवसरात्र पाण्याचा उपसा करीत आहे. अशावेळी रबी पिकाला पाणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ओरड होत असताना धरणातून पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्या डाव्या-उजव्या कालव्याचे पाणी दैनावस्था झालेल्या कालव्यांमुळे जास्त अंतर कापू शकले नाही. सदर दोन्ही कालव्यांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचेच स्वरूप आले. इतकेच नव्हे तर आकोली-गिरोली मार्गावरील एसकेएफ गेटमधून पाण्याची संततधार सुरु आहे. त्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच क्षीरसमुद्र गावाजवळील धोंडीकर यांच्या शेतानजीक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासह विविध करणांमुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अतिशय अल्प अंतर कापले. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने यंदा रबी हंगामासाठी जमीन कसली आहे. परंतु, पाणीच शेतापर्यंत पोहोचले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा रबी पिकांची लागवड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे. कोरड्या दुष्काळाचे सावट असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.टेबलवरूनच कालव्यांची पाहणीकालवा निरिक्षक कधीही कालव्याची पाहणी करीत नसल्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर ते शेतकºयांशी साधा संवादही साधत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांसह नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच धरणावर पथदिवे बसविले होते. परंतु, विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सदर पथदिवे सध्या बंदच आहेत. या प्रकरणी अधिकाºयांच्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण