शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता १५०० ची, प्रत्यक्ष लाभ २५० हेक्टरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते;....

ठळक मुद्देमदन उन्नई धरणाच्या कालव्यांना गळती

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते; पण फुटलेल्या पाटचऱ्या, वाढलेली झुडपे तसेच कालव्यांना पडलेले तडे यामुळे प्रत्यक्षात २००-२५० हेक्टर शेती कशीबशी सिंचनाखाली आली असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने मदन उन्नई धरणाची पाणी पातळी पाहिजे तशी वाढली नाही. अशात एक उद्योग कंपनी दिवसरात्र पाण्याचा उपसा करीत आहे. अशावेळी रबी पिकाला पाणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ओरड होत असताना धरणातून पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्या डाव्या-उजव्या कालव्याचे पाणी दैनावस्था झालेल्या कालव्यांमुळे जास्त अंतर कापू शकले नाही. सदर दोन्ही कालव्यांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचेच स्वरूप आले. इतकेच नव्हे तर आकोली-गिरोली मार्गावरील एसकेएफ गेटमधून पाण्याची संततधार सुरु आहे. त्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच क्षीरसमुद्र गावाजवळील धोंडीकर यांच्या शेतानजीक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासह विविध करणांमुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अतिशय अल्प अंतर कापले. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने यंदा रबी हंगामासाठी जमीन कसली आहे. परंतु, पाणीच शेतापर्यंत पोहोचले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा रबी पिकांची लागवड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे. कोरड्या दुष्काळाचे सावट असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.टेबलवरूनच कालव्यांची पाहणीकालवा निरिक्षक कधीही कालव्याची पाहणी करीत नसल्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर ते शेतकºयांशी साधा संवादही साधत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांसह नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच धरणावर पथदिवे बसविले होते. परंतु, विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सदर पथदिवे सध्या बंदच आहेत. या प्रकरणी अधिकाºयांच्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण