शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

देवळी-नांदोरासह हिंगणी -बोरधरण मार्गावर नवीन पूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 AM

खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देसमन्वय बैठकीत खासदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने गावांना जोडणारे पूल व रस्ते अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे बस फेऱ्या प्रभावित होवून विद्यार्थीवर्गाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील देवळी-नांदोरा व सेलू तालुक्यातील हिंगणी-बोरधरण मार्गावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेता तेथे नवीन पूल बांधण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.देवळी-नांदोरा या प्रमुख जिल्हा मार्गावर उभा असलेला पूल क्षतिग्रस्त झाल्याने अनेक बसफेऱ्या प्रभावित होऊन विद्यार्थी वर्गाच्या दळण वळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थी वर्गाला त्रास होऊ नये म्हणून बसफेºया पर्यायी मार्गाने सोडण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.क्षतिग्रस्त झालेल्या पुलाच्या दुरूस्तीचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णत: बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम २०१९ वर्षाच्या अर्थसंकल्पीय यादीत मंजूर झाले आहे. तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ नवीन पुलाचे कार्य प्रारंभ करावे, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी दिल्या.सेलू तालुक्यातील बोरधरण-हिंगणी मार्गावरील बोरी कोकाटे गावाजवळील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्याठिकाणी देखील तात्काळ नवीन पूल बांधकामाचे कार्य प्रारंभ करावे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण भरलेले आहे. येत्या काळात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागाने सतर्क राहून सर्व विभागांनी समनव्यातून कार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस