शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बोंडअळीच्या आक्रमणाने बीटी कपाशीची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:25 IST

बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली.

ठळक मुद्देशेतकºयांच्या चिंतेत वाढ : उत्पादनात घट येण्याची शक्यता, उत्पन्नापेक्षा ठरणार खर्चच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली. काही वर्षे कंपन्यांचा दावा खरा ठरला; पण मागील वर्षीपासून बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. यंदाही बीटी बोंडअळीने कपाशीची चाळणी केली आहे. अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने शेतकºयांची चिंता मात्र वाढली आहे.नॉन बीटी कपाशी बियाण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. आलेली पाती गळून जाते. उत्पादनात मोठी घट येते. यामुळे शेतकºयांनी घरची सरकी गाळून तिचा बियाणे म्हणून वापर करण्याला सोडचिठ्ठी देत शासन व कंपन्यांच्या जाहीरातबाजीला बळी पडत महागडे बीटी कपाशी बियाणे वापरण्याची मानसिकता केली. ही बाब हेरून धर्मा, राशी, भक्ती, विठ्ठल, अजीत अशा नानाविध कंपन्यांनी बीटी बियाण्यांची निर्मिती केली. उत्पादन खर्च ५०० च्या आत असला तरी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चिरीमीरी देत एमआरपी ९५० पर्यंत वाढवून घेतली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत शेतकºयांनी ४५० ग्रॅम बियाण्यांसाठी ९५० रुपये मोजले. ही बाब शेतकºयांची लूट करणारी असल्याचे उशीरा लक्षात आल्याने शासनाने कंपन्यांना भाव कमी करण्याची विनंती केली. कंपन्यांनी विनंती अमान्य केल्यावर शासकीय बडगा उगारून बियाण्यांचे भाव ७०० ते ७५० रुपयांवर आणले. भाव अधिक असले तरी फवारणीचा खर्च कमी येणार व रोग प्रतिकारक शक्ती बºयापैकी असल्याने राज्यातील समस्त शेतकºयांनी सर्व वाणांना दूर सारत बीटी बियाण्यांचा वापर केला. आता मात्र या वाणाच्या कपाशीवर सर्वच प्रकारचे रोग येत आहे.पांढरी माशी व बोंडअळी यांना हे वाण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. कंपनीकडे विचारणा केली असता ते आता या वाणातील ‘सिन्ड्रोम’ कमजोर झाला. किडींची प्रतिकार शक्ती वाढली. यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणून हात झटकत आहे. यंदा कपाशी समाधानकारक दिसत असली तरी केवळ झाडांची केवळ वाढ झाली आहे. बोंडाची संख्या नगण्य आहे. पांढरी माशी व बोंडअळीच्या परिणामाने पाती, फुल व बोंडे गळत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्नवाढ यापेक्षा उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नही कमी हे सूत्र स्वीकारून शेतकºयांना लाभ देण्याकरिता शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.अन्यथा बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करावेबियाण्यांतील रोगप्रतिकारक घटक कमजोर झाला असेल तर नवीन संशोधन करून रोगांना बळी न पडणारे वाण कंपन्यांनी बाजारात आणणे गरजेचे होते; पण असे न करता जुन्याच तंत्रज्ञानाने बियाणे तयार करून शेतकºयांना लुटण्याचे धोरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. शासनाने भाव कमी करण्यासाठी दबाव तंत्र वापरले. आता कंपन्यांनी रोगांना बळी न पडणारे बियाणे रास्त भावात निर्माण करण्यासाठी दबाव टाकावा. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.