शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बोंडअळीच्या आक्रमणाने बीटी कपाशीची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:25 IST

बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली.

ठळक मुद्देशेतकºयांच्या चिंतेत वाढ : उत्पादनात घट येण्याची शक्यता, उत्पन्नापेक्षा ठरणार खर्चच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली. काही वर्षे कंपन्यांचा दावा खरा ठरला; पण मागील वर्षीपासून बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. यंदाही बीटी बोंडअळीने कपाशीची चाळणी केली आहे. अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने शेतकºयांची चिंता मात्र वाढली आहे.नॉन बीटी कपाशी बियाण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. आलेली पाती गळून जाते. उत्पादनात मोठी घट येते. यामुळे शेतकºयांनी घरची सरकी गाळून तिचा बियाणे म्हणून वापर करण्याला सोडचिठ्ठी देत शासन व कंपन्यांच्या जाहीरातबाजीला बळी पडत महागडे बीटी कपाशी बियाणे वापरण्याची मानसिकता केली. ही बाब हेरून धर्मा, राशी, भक्ती, विठ्ठल, अजीत अशा नानाविध कंपन्यांनी बीटी बियाण्यांची निर्मिती केली. उत्पादन खर्च ५०० च्या आत असला तरी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चिरीमीरी देत एमआरपी ९५० पर्यंत वाढवून घेतली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत शेतकºयांनी ४५० ग्रॅम बियाण्यांसाठी ९५० रुपये मोजले. ही बाब शेतकºयांची लूट करणारी असल्याचे उशीरा लक्षात आल्याने शासनाने कंपन्यांना भाव कमी करण्याची विनंती केली. कंपन्यांनी विनंती अमान्य केल्यावर शासकीय बडगा उगारून बियाण्यांचे भाव ७०० ते ७५० रुपयांवर आणले. भाव अधिक असले तरी फवारणीचा खर्च कमी येणार व रोग प्रतिकारक शक्ती बºयापैकी असल्याने राज्यातील समस्त शेतकºयांनी सर्व वाणांना दूर सारत बीटी बियाण्यांचा वापर केला. आता मात्र या वाणाच्या कपाशीवर सर्वच प्रकारचे रोग येत आहे.पांढरी माशी व बोंडअळी यांना हे वाण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. कंपनीकडे विचारणा केली असता ते आता या वाणातील ‘सिन्ड्रोम’ कमजोर झाला. किडींची प्रतिकार शक्ती वाढली. यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणून हात झटकत आहे. यंदा कपाशी समाधानकारक दिसत असली तरी केवळ झाडांची केवळ वाढ झाली आहे. बोंडाची संख्या नगण्य आहे. पांढरी माशी व बोंडअळीच्या परिणामाने पाती, फुल व बोंडे गळत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्नवाढ यापेक्षा उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नही कमी हे सूत्र स्वीकारून शेतकºयांना लाभ देण्याकरिता शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.अन्यथा बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करावेबियाण्यांतील रोगप्रतिकारक घटक कमजोर झाला असेल तर नवीन संशोधन करून रोगांना बळी न पडणारे वाण कंपन्यांनी बाजारात आणणे गरजेचे होते; पण असे न करता जुन्याच तंत्रज्ञानाने बियाणे तयार करून शेतकºयांना लुटण्याचे धोरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. शासनाने भाव कमी करण्यासाठी दबाव तंत्र वापरले. आता कंपन्यांनी रोगांना बळी न पडणारे बियाणे रास्त भावात निर्माण करण्यासाठी दबाव टाकावा. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.