शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खैरी गावाचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात.

ठळक मुद्देपुलावरून वाहते पुराचे पाणी : ग्रामस्थांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : धाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नजीकच्या खैरी गावात जाणाऱ्या पुलावरून सध्या पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे या गावाचा काल रात्रीपासून इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने शळकरी मुला-मुलींना घरीच रहावे लागले. खैरी गावाकडे जाणाºया पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी आहे.खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात. नदीवरील पुलाची उंची वाढविण्यासाठी मागील २० वर्षांपासून संबंधित विभागाला वारंवार निवेदन देण्यात आली. परंतु, दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. मागील निवडणुकीच्या वेळी तीव्र आंदोलनाचा पवित्रा येथील ग्रामस्थानी घेतला होता. त्याची दखल घेऊन वेळीच योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर