शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

हस्ताक्षरांतील सुंदरता होतेय लुप्त

By admin | Updated: January 29, 2015 23:13 IST

तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून

तुळजापूर (व़) : तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़ कला शिक्षकांनी हस्ताक्षराचे अधिक तास घेऊन शाळेत सुंदर अक्षर हा दागिना म्हणून जतन करणे गरजेचे झाले आहे़ अति प्राचीन काळापासून म्हणजे अगदी संत-महंतांच्या काळापासून काही काव्य, भारूड, ऐतिहासिक पत्रे लोकगीते आदी वाड़मय प्रकार स्वरूपाचे हस्तलिखाण केले जात होते़ एखाद्या व्यक्तीकरवी सुंदर हस्ताक्षर लिहून जतन करून ठेवले जात होते़ यासाठी शाई आणि बोरूचा वापर केला जात होता़ आताच्या बॉलपेनच्या युगात मुलांना शाईपेनचा विसर पडत चालला आहे. सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा अनमोल ठेवा आहे. अक्षरं सुंदर असल्यास शिक्षकच नव्हे तर मित्र, मैत्रिण, नातेवाईक, उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक त्याच्या अक्षरावर प्रसंगी त्याच्या विद्वत्तेवर प्रेम करतात़ एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कसे सुधारेल, त्याचा हा दागिना कसा टिकून राहील, यासाठी कलाशिक्षक त्यांना चांगलेच राबवून घेताना दिसत होते; पण ते आज दिसत नसून कालबाह्य होऊ पाहत आहे़ या धकाधकीच्या जीवनचक्रात सुंदर हस्ताक्षर जिवंत राहावे म्हणून शहराच्या मध्यभागी हस्ताक्षरे सुधारवर्ग घेतले जातात़ यात विद्यार्थ्यांकडून वारेमाप शुल्क घेऊन बालक-पालकांची गोची केली जाते; पण यातून ते इच्छा पूर्ण करीत आहे. आधुनिक लिखाणाच्या साधनांमुळे सर्व स्वलेखन विसरून भोगवादाकडे वळले आहेत़ हा चिंतेचा विषय आहे़ विज्ञान युगात वेगवेगळे आधुनिक शोध लागतात़ इंटरनेट, लॅपटॉप, संगणक, टायपिंग, टचस्क्रीन लॅपटॉप यासह अन्य साधनांचा वापर विद्यार्थ्यांपासून तर अधिकारी वर्गापर्यंत होताना दिसतो़ यामुळे स्वत: लिखाण करण्याचा सराव खुंटला आहे़ साधा अर्ज लिहायचा झाल्यास आधुनिक साधनांचा वापर करून पैसे मोजून वेळ मारून नेली जाते़ यात ग्रामीण बालक-पालकांची गोची होते़ या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कला शिक्षक व शाळांनीही या विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)