शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

वाहन चालविताना कुंटूंबाच्या जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:22 AM

व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते.

ठळक मुद्देरामदास तडस : वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळण-वळणासाठी सोईचे ठरतात. असे असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. तरुणांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत: सोबत कुंटूबीय व इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वाहतूक सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, आजच्या काळात अपघाताने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यू होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नवीन कायद्यासोबतच दंड व शिक्षेतही वाढ केली आहे. या कायद्यातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुसऱ्याच्या जीवाचाही विचार करावा असेही यावेळी खा. तडस यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी केले तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.नव्या वाहतूक कायद्याची जनजागृती करा : जिल्हाधिकारीपरिवार हा आयुष्याचा केंद्र बिंदू आहे. आपली एक चूक दुसºयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गाच्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडताना तसेच वाहन चालविताना दक्ष राहिले पाहिजे. केंद्र शासनाने केलेल्या नवीन वाहतूकीच्या नियमाची संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी. अपघातास कारणीभूत ठरल्यास शिक्षा होऊ शकते, याची माहितीही अधिकाºयांनी नागरिकांना पटवून द्यावी, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले.अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करणार - तेलीदरवर्षी अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष शासनाचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात यंदा ६ टक्के अपघात कमी झाले आहेत. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व माल लादून वाहतूक करणे तसेच वेगाने वाहन चालविणे या छोट्या-छोट्या बाबी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस