शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

बळीराजांनो..! आता रडायचं नाही तर लढायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:04 IST

अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विधवांचं ‘तेरवं’: रंगभूमीवर साकारली संघर्षगाथा

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर विधवा ही रणरागीणी बणून घराचा अख्खा भार तोलते. तिच्या याच संघर्षाची ही गाथा ‘तेरवं’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर साकारण्यात आली आहे. यातून ‘बळीराजांनो...!आता रडायच नाही तर लढायचं’ असे आवाहन करण्यात आले आहे.कृषीप्रधान देशातील शेतकरी समाजातील दुर्लक्षीत घटकच म्हणावा लागेल. शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकºयांचा बळी घेतल्या जात आहे. शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने कर्जाचा वाढता डोंगर सर करण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते. संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह आणि आजारपणावर उपचार या सर्वांची घडी बसवितांना तो हतबल होतो. यातूनच नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागतो. शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही याचे सरकारला सोयरं सुतक नाही. शेतकरी निघून गेल्यानंतर घराबाहेर पाय न ठेवणारी महिलाही कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्व दु:ख गिळून खंबीरपणे उभी राहते. तेव्हापासून तिच्या खºया संघर्षाला सुरुवात होते.परिवाराचा सांभाळ, समाजाच्या पडणाºया नजरा या सर्व आघातावर वार करुन पुन्हा आपलं नवी विश्व निर्माण करते. हीच संघर्षगाथा महिलांनी या नाटकातून साकारली.तेरा पात्रांनीच साकारल ‘तेरवं’विदर्भातील अध्ययन भारती परिवार आणि अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा या संस्थांच्या मदतीनं हे नाटकं रंगभूमीवर आलं आहे. संवेदनशील आणि सामाजिक भान जोपासणारे लेखक श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिले असून याचं दिग्दर्शन नाट्यकर्मी हरीश इथापे यांनी केलं आहे. या नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागातील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहेत. तर या संस्थेतील सहा जणींनी सहाय्यक भूमिका साकारल्या असून एकूण तेरा पात्रांनी काम केलं आहे. या नाटकात लोकगीतांचा वापर केला असून हे संगीत विरेंद्र लाटनकर यांनी दिले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग चंद्रपुरला झाला असून चांगला प्रतिसादही मिळाला.जे भोगलं, जे सोसलं ते रंगभूमीवर अवतरलंया संवेदनशील नाटकात आत्महत्याग्रस्त परिवारातील विधवांनी घरचाकर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांनी एकाकी जीवनात जे भोगलं, जे सोसलं तेच ‘तेरवं’ या नाटकातून रंगभूमीवर मांडल आहे. त्यासाठी या महिलांना खास नाट्य प्रशिक्षणही देण्यात आलं. वर्ध्यालगतच्या रोठा येथील ‘अ‍ॅग्रो थिएटर’ येथे दोन ते अडीच महिने परिश्रम घेतले. यातील महिला कलाकारांनी अक्षत तृतीया, दसरा असो वा दिवाळी; सर्व सण तालीम करीत.घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर महिलेच्या वाट्याला येणाºया संघर्षाचे जाणीव या नाटकातून होते. समाजातील हरवत असलेल्या माणूसकीला जागं करणारं हे नाटक असून शासनाने व समाजाने हे दु:ख समजून घ्यावं.हरीष इथापे, नाट्य दिग्दर्शक, वर्धा.