शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजांनो..! आता रडायचं नाही तर लढायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:04 IST

अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विधवांचं ‘तेरवं’: रंगभूमीवर साकारली संघर्षगाथा

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर विधवा ही रणरागीणी बणून घराचा अख्खा भार तोलते. तिच्या याच संघर्षाची ही गाथा ‘तेरवं’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर साकारण्यात आली आहे. यातून ‘बळीराजांनो...!आता रडायच नाही तर लढायचं’ असे आवाहन करण्यात आले आहे.कृषीप्रधान देशातील शेतकरी समाजातील दुर्लक्षीत घटकच म्हणावा लागेल. शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकºयांचा बळी घेतल्या जात आहे. शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने कर्जाचा वाढता डोंगर सर करण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते. संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह आणि आजारपणावर उपचार या सर्वांची घडी बसवितांना तो हतबल होतो. यातूनच नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागतो. शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही याचे सरकारला सोयरं सुतक नाही. शेतकरी निघून गेल्यानंतर घराबाहेर पाय न ठेवणारी महिलाही कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्व दु:ख गिळून खंबीरपणे उभी राहते. तेव्हापासून तिच्या खºया संघर्षाला सुरुवात होते.परिवाराचा सांभाळ, समाजाच्या पडणाºया नजरा या सर्व आघातावर वार करुन पुन्हा आपलं नवी विश्व निर्माण करते. हीच संघर्षगाथा महिलांनी या नाटकातून साकारली.तेरा पात्रांनीच साकारल ‘तेरवं’विदर्भातील अध्ययन भारती परिवार आणि अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा या संस्थांच्या मदतीनं हे नाटकं रंगभूमीवर आलं आहे. संवेदनशील आणि सामाजिक भान जोपासणारे लेखक श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिले असून याचं दिग्दर्शन नाट्यकर्मी हरीश इथापे यांनी केलं आहे. या नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागातील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहेत. तर या संस्थेतील सहा जणींनी सहाय्यक भूमिका साकारल्या असून एकूण तेरा पात्रांनी काम केलं आहे. या नाटकात लोकगीतांचा वापर केला असून हे संगीत विरेंद्र लाटनकर यांनी दिले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग चंद्रपुरला झाला असून चांगला प्रतिसादही मिळाला.जे भोगलं, जे सोसलं ते रंगभूमीवर अवतरलंया संवेदनशील नाटकात आत्महत्याग्रस्त परिवारातील विधवांनी घरचाकर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांनी एकाकी जीवनात जे भोगलं, जे सोसलं तेच ‘तेरवं’ या नाटकातून रंगभूमीवर मांडल आहे. त्यासाठी या महिलांना खास नाट्य प्रशिक्षणही देण्यात आलं. वर्ध्यालगतच्या रोठा येथील ‘अ‍ॅग्रो थिएटर’ येथे दोन ते अडीच महिने परिश्रम घेतले. यातील महिला कलाकारांनी अक्षत तृतीया, दसरा असो वा दिवाळी; सर्व सण तालीम करीत.घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर महिलेच्या वाट्याला येणाºया संघर्षाचे जाणीव या नाटकातून होते. समाजातील हरवत असलेल्या माणूसकीला जागं करणारं हे नाटक असून शासनाने व समाजाने हे दु:ख समजून घ्यावं.हरीष इथापे, नाट्य दिग्दर्शक, वर्धा.