शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा

By admin | Updated: April 14, 2016 02:48 IST

देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली.

तो दगड ठरला भेटीचा साक्षीदार : सेवाग्राम येथे महामानव आणि राष्ट्रपित्याची चर्चा
दिलीप चव्हाण सेवाग्राम
देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. या चर्चेत डॉ. आंबेडकर यांनी सेवाग्राम येथील दलित बांधवांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या गावात जाण्यासाठी सायंकाळ झाल्याने त्यांनी खुल्या मैदानात एका दगडावर बसून समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तो दगड आजही येथे कायम असून त्या स्मृती अनेकांना प्रेरणादायी ठरत आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या दगडाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. शिवाय येथे बसून त्यांनी दिलेला संदेश का फलकावर लिहून तो सर्वांना कळावा, यासाठी हा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. येथे येणारे या स्थळी प्रेरणा मिळत असल्याचे बोलून दाखवितात. त्या मैदानात उपस्थित गावातील काही नागरिक आजही त्या क्षणाची साक्ष देतात. डॉ. आंबेडकर १ मे १९३६ रोजी सेवाग्राम येथे आले होते. बापुकुटीत महात्मा गांधी यांची भेट घेत त्यांच्यात चर्चा झाली. या गावातील समाज बांधवांमध्ये आपल्या हक्काकरिता लढण्याची जनजागृती व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी मूळ गावात जाऊन संवाद साधला.

शिक्षणाची कास धरण्याचे केले होते आवाहन
सेवाग्राम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम या मूळ गावात जाऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन समाजबांधवांना केले होते. ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते, ती जागा व दगड सौंदर्यीकृत करून त्यांच्या स्मृती आजही जोपासल्या जात आहे. महात्मा गांधी दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे अस्वस्थ होते. याच काळात डॉ. आंबेडकर यांचा या अन्यायाविरोधात लढा सुरू होता. दोन्ही महात्म्यांचे विचार एक असले तरी काही बाबतीत तात्विक वाद होते. या दोघांत चर्चा व्हावी, या उद्देशाने १ मे १९३६ रोजी जमनालाल बजाज यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट आश्रमात बापूंशी घडवून आणली. येथील बौद्ध विहाराच्या परिसरातील ही जागा आता समाज बांधवांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाकरिता प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चर्चेचे साक्षीदार पांडुरंग गोसावी, नामदेव गोसावी, आत्माराम ताकसांडे तो क्षण आपल्या डोळ्यांत आजही साठवून आहेत.