शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. तर सोबतच निवडणूक ...

ठळक मुद्देपोलिंग स्टाफची आकेडवारी : सर्वाधिक स्टाफ लागणार गोंदिया मतदार संघात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. तर सोबतच निवडणूक निर्विघ्न्न पार पडली पाहिजे यासाठी प्रशासनाचीही दमछाक होत असल्याचे दिसत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली पाहिजे, यासाठी प्रशासनाने पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पोलिंग स्टाफ म्हणून फौज उभी केली आहे. यातील सर्वाधिक एक हजार ५८४ अधिकारी-कर्मचारी गोंदिया विधानसभा मतदार संघात लागणार आहेत.निवडणूक आयोगाने मुहूर्त काढून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच निवडणुकीला रंगत चढू लागली आहे. पुढील ३ दिवसांनंतर नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात होणार असल्याचे आता उमेदवारांच्या नावांना घेऊन सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता इच्छुकांचे टेंशन वाढले असून त्यांची आपापल्या क्षेत्रात धावपळ व भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. सर्वांच्या नजरा २१ व २४ तारखेवर लागल्या असून विजयाची माळ कुणाच्या गळ््यात याचीच उत्कंठा दिसून येत आहे.हे सर्व सुरू असताना मात्र विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी प्रशासन रात्रंदिवस एक करीत आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघात निवडणूक घेतली जाणार असून एक हजार २८१ व एक सहाय्यकारी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. या केद्रांचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज उभी केली आहे. हे अधिकारी-कर्मचारी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील कामकाज सांभाळणार असून या पोलींग स्टाफच्या भरवशावरच विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली जाणार आहे. यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघात ३१६ मतदान केंद्र राहणार असून यासाठी एक हजार ३९०, तिरोडा विधानसभा मतदार संघात २९५ मतदार केंद्र राहणार असून एक हजार २९८, गोंदिया विधानसभा मतदार संघात ३६०+१ मतदान केंद्र राहणार असून एक हजार ५८४ तर आमगाव विधानसभा मतदार संघात ३१० मतदान केंद्र राहणार असून एक हजार ३६४ अधिकारी-कर्मचाºयांचा पोलींग स्टाफ राहणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील १२८१+१ मतदान केंद्रांसाठी एकूण पाच हजार ६३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.मतदानासाठी साहित्य उपलब्धजिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मतदान साहित्य उपलब्ध झाले आहे. यात एक हजार ७०४ कंट्रोल युनिट, दोन हजार ३८९ बॅलेट तसेच एक हजार ७०८ व्हीव्हीपॅट आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाक डून सर्वच साहित्यांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019