शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM

नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आतापर्यंत ८ ते १० अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तसेच रस्ता बांधकामातील तांत्रिक कारणाअभावी अडचणीच्या ठरलेल्या अंदोरी टी पॉर्इंटची खासदार रामदास तडस,राष्ट्रीय महामार्ग व बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी वारंवार होणाºया या घटनांना संबंधीत अधिकारी व त्यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला. काल परवा पुन्हा या पॉर्इंटवर ट्रॅव्हल्स अपघातात भाऊराव फटींग नामक शेतमजुराचे दोन्ही पाय निकामी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे. हा ग्रामीण रस्ता वर्दळीचा ठरला असताना प्रशासनाच्यावतीने देवळीकडे जाणाºया वळण रस्त्यावर बोगदा न देता या मार्गाची वाहतूक सरळ महामार्गावर काढण्यात आली. त्यामुळे रस्ता नियमाचे विरोधात व चुकीच्या पद्धतीने ही वाहतूक महामार्गावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले.दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर काल परवा झालेल्या अपघातात देवळीतील शेतमजूरांचे दोन्ही पाय निकामी होवून मृत्यूशी झुंज देत असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार तात्पुरती व्यवस्था म्हणून अंदोरी टी पॉर्इंटवरून यवतमाळकडे जाणाºया महामार्गावर युटर्न देण्याचे तसेच याठिकाणी वाहतुकीचे नियमानुसार सोलर लाईट रिफ्लेक्टर, थर्माप्लॉस्टीकचे ब्रेकर बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच नेहमीसाठीची व्यवस्था म्हणून अंदोरी वळण रस्त्यावर उजव्या बाजूने महामार्गाला समांतर रस्ता काढून हा रस्ता स्मशानभूमीच्या रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रशासकीय सोपस्कार व अपेक्षीत इस्टीमेट तयार करून रस्ता बांधकाम पूर्णत्वास नेणार असल्याने खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी याबाबतचे निवेदन खासदारांना व अधिकाºयांना देवून लक्ष वेधले. यवतमाळ - वर्धा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे लहान गावांना जाण्यासाठी कमालीची अडचण येत आहे. मागणीचा पाठपुरावा प्रणय जोशी, दशरथ भुजाडे, रवि कारोटकर, संजय मुजबैले, राजू झिलपे, अनिल खोंड, विनोद तेलरांधे, अंकीत टेकाडे, नरेश कारोटकर, वसंत तेलरांधे, मनोज कामडी, विजय ढाकुलरकर, वसंत घोडे, संजय सोनवने, सुनिल आजनकर व नागरिकांनी केले.