शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा जोडीदार म्हणून १२ दिव्यांगांचा केला स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:38 IST

५० हजारांचे अनुदान : रोख २० हजार, २५ हजार रुपयांचे बचतपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी एक विवाह संस्कार मानला जातो. सुसंस्कृत समाजात योग्य जोडीदाराच्या निवडीसाठी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. गत वर्षात १२ धडधाकट व्यक्तींनी आयुष्याचा जोडीदार म्हणून दिव्यांगांचा स्वीकार केला आहे. वर्षाकाठी किमान पाच ते कमाल आठ असे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला प्राप्त झाले असून त्याच्या सुखी संसारासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे, यासाठी दिव्यांग आणि दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक साहाय्य केले जाते, त्याचप्रमाणे दिव्यांग व अव्यंग व्यक्ती विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्याची योजना सुरू करण्यात आली.

२०१४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. २०१६ पासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दिव्यांग अव्यंग विवाहास प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. यावर्षी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या सात जोडप्यांनी अर्थसाहाय्यतेसाठी अर्ज केले.

शासनाकडून प्रति जोडपे ५० हजार रुपये याप्रमाणे गतवर्षी १२ जोडप्यांसाठी सहा लाख रुपये समाज कल्याण विभागाकडून वितरित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीनी विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षात जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.

किती मिळते अनुदानया योजनेत लाभार्थीना रोख २० हजार देण्यात येतात. २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. साडेचार हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात येते. ५०० रुपये स्वागत समारंभासाठी दिले जातात. अशा एकूण ५० हजार रुपयांची मदत देऊन या जोडप्यांचा सत्कार केला जातो. वर्ष २०२३-२४ या काळात १२ जोडप्यांना सहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

अनुदानाचे निकष काय● योजनेचा लाभ घेणारे दिव्यांग वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.● लाभार्थींपैकी कोणीही एक व्यक्ती ४० टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असावा. तसेच वर-वधूचा हा प्रथम विवाह असावा.● वर किंवा वधू घटस्फोटित असल्यास योजनेची यापूर्वी मदत घेतलेली नसावी.● विवाह हा कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक.

"या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५७ लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे. योजनेबाबात जनजागृती झाल्याने अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण वाढतीवर आहे. गत वर्षात १२ जोडप्यांना योजनेतून लाभ देण्यात आला आहे. वर्षाकाठी किमान आठ ते १० अर्ज समाज कल्याण विभागाला प्राप्त होतात."- सोनाली शिंदे, सहा, सल्लागार, समाज कल्याण जि. प. वर्धा.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा