शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते.

ठळक मुद्देहवालदिल शेतकऱ्यांना मिळणार आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या या हेतूने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली; पण मध्यंतरी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्जमुक्तीसाठी महत्त्वाची प्रणाली असलेली आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया थप्प झाली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा नव्या जोमाने वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सुरू झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील ७ हजार ९०१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्याच्या विषयाला ब्रेक लागला होता.तर आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.३८,२७३ शेतकऱ्यांनी दिली ३४३.०९ कोटींची रक्कमजिल्ह्यातील ३८,२७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ३४३.०९ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. असे असले तरी अनेकांना अजूनही कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.१,९७८ अर्जात आढळल्यात त्रुट्याऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या एकूण अर्जापैकी १ हजार ९७८ अर्जात विविध त्रुट्या असल्याचे छाणणीदरम्यान निदर्शनास आले. त्यापैकी ७२१ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी सध्या ८७ प्रकरणे प्रलंबीत आहेत. तर तालुका समितीकडे १ हजार ९८ प्रकरणे पाठविण्यात आली. त्यापैकी सध्या ७२ प्रकरणे प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज