आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:29 PM2019-12-13T15:29:45+5:302019-12-13T15:42:12+5:30

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती.

73 thousand farmers suffer due to no link to Aadhaar account | आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

Next

वर्धा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. या योजनेत वर्धा जिल्ह्यात १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी लाभार्थी म्हणून करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ७३ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
 
वर्धा जिल्ह्यात १ लाख १३ हजार १३ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र आहे. यापैकी ३९ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते मोबाईल क्रमांक, आधार याच्याशी लिंक करण्यात आले आहे. या शेतक-यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी २ हजार प्रमाणे तीन टप्प्यात दिले जात आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी या योजनेच्या लाभासाठी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पीएम किसान पोर्टल येथे हे नावे नोंदविले. यापैकी ७३ हजार ५८७ शेतक-यांचे बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे केवळ ३९ हजार ४१८ शेतक-यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.
-----
सेवा केंद्रात लिंकचे काम युद्धपातळीवर चालणार
जिल्ह्यातील लाभ न मिळालेल्या ७३ हजार ५८५ शेतक-यांची संख्या लक्षात घेऊन आता बँक खाते, मोबाईल क्रमांक व आधार याच्याशी लिंक करण्याचे आदेश सेवा केंद्रांना प्रशासनाने दिले आहे. त्या दृष्टीने सर्व तहसीलदार व महाऑनलाइनचे समन्वयक शेतक-यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर कामाला गती देण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तांनीही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

Web Title: 73 thousand farmers suffer due to no link to Aadhaar account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.