शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाची ३६७ प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: September 26, 2016 02:08 IST

शासनाकडून विविध प्रकल्प, रस्ते व अन्य ‘प्रोजेक्ट’करिता शेतकरी, सामान्य नागरिकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात.

२० वर्षांची प्रतीक्षा : ६४ प्रकरणांत २७.५२ कोटींचे वाटपप्रशांत हेलोंडे  वर्धाशासनाकडून विविध प्रकल्प, रस्ते व अन्य ‘प्रोजेक्ट’करिता शेतकरी, सामान्य नागरिकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात. धरणांसारख्या प्रकल्पासाठी तर गावेच्या गावे अधिग्रहित करावी लागतात. या गावांचे पुनर्वसन त्वरित होणे आणि जमिनीचा मोबदला कुठलाही दगाफटका न करता मिळणे अपेक्षित असते; पण असे होताना दिसत नाही. यामुळेच २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही वर्धा जिल्ह्यातील ३६७ प्रकरणे प्रलंबित आहेत. यात २५१ प्रकरणांत थेट खरेदीचे धोरण अवलंबिल्याने मोबदल्याकरिता ११६ प्रकरणे प्रलंबित आहेत. आजपर्यंत ६४ प्रकरणांचा निपटारा झाला असून २७ कोटी ५२ लाख २४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, मदन उन्नई यासह अन्य मध्यम प्रकल्प व तलाव आहेत. या प्रकल्पांच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या जमिनींचे शासनाकडून अधिग्रहण करण्यात आलेले आहे. जमीन, गाव अधिग्रहणाच्या या प्रक्रियेला तब्बल २० ते २५ वर्षांचा कालावधी लोटला आहे; पण अद्यापही गावांचे योग्यरित्या पुनर्वसन करण्यात आलेले नाही. शिवाय प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदलाही देण्यात आलेला नाही. निम्न वर्धा प्रकल्पासाठी वर्धा आणि अमरावतील जिल्ह्यातील सुमारे ३४ गावांचे अधिग्रहण करण्यात आले होते. यातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. २५ वर्षांच्या कालावधीनंतर सदर प्रकल्पाला मूर्त रूप मिळाले; पण अद्यापही त्या प्रकल्पाला पूर्ण झाला, असे म्हणता येत नाही. अद्यापही प्रकल्पबाधित गावांचे योग्यरित्या पूनर्वसन झालेले नाही. ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. इतकेच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांना अल्प मोबदला देण्यात आला होता. या प्रकारामुळे शेकडो शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. यातील प्रकरणांचा निकाल लागत असून प्रशासनावर जप्तीची नामुष्की ओढवत आहे. आजपर्यंत पाच ते सहा वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली; पण आजही प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जमिनी सिंचन प्रकल्पांकरिता अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे ४ हजार ४४० शेतकरी विस्थापित झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही शासनाकडून योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. सप्टेंबर २०१६ मात्र या प्रकल्पग्रस्तांकरिता आशेचा किरण घेऊन आलेला आहे. शासनाने जमिनी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. यामुळेच भूसंपादन विभागाकडून आजपर्यंत ६४ प्रकरणांमध्ये २७ कोटी ५२ लाख २४ हजार रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. यात निम्न वर्धा प्रकल्पाचीच ५६ प्रकरणे असून आठ प्रकरणे अन्य प्रकल्पांशी संबंधित आहेत. जिल्ह्यात आणखी ३६७ प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील २५१ प्रकरणांमध्ये शासनाने थेट खरेदीचे धोरण अवलंबण्यात आले. यामुळे जमीन अधिग्रहणाची ११६ प्रकरणे शासन दरबारी मोबदल्यासाठी प्रलंबित आहेत. कोट्यवधींचा मोबदला थकीतशासनाकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांना कोट्यवधी रुपये घेणे आहे. म्हसाळा रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यालाच सुमारे दोन कोटी रुपये शासनाकडून घेणे होते. यासाठी जप्तीचा आदेशही न्यायालयाने दिला होता. कोट्यवधींच्या निधीची गरज असताना शासनाकडून तो पुरविला जात नसल्याने अधिकारी अडचणीत येतात, हे वास्तव आहे. या महिन्यात भूसंपादन विभागाला २० कोटींचा निधी प्राप्त झाला. यातून लहान-मोठ्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. असे असले तरी उर्वरित प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.