शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

अप्पर वर्धा धरणात २९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:15 IST

दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देमृत जलसाठा ओलांडतोय खालची पातळी : हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विशेषत: मृत जलसाठा आतापासूनच अधिक खालची पातळी गाठत असल्याने ऐन हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.अप्पर वर्धा धरण आष्टी तालुक्याची शान आहे. १९९० पासून या ठिकाणी कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धरणामध्ये जलसाठा झाला नाही. दरवर्षी धरणाचे १३ दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात होते. मात्र यावर्षी धरणाच्या समोरच्या भागातही काहीच पाणी नसल्याने कोरडाठण पाहायला मिळतो. या धरणामधून उर्ध्व वर्धा, डावा कालवा अंतर्गत ३४ कि.मी. पर्यंत पाणी पुरविल्या जाते. शेतकºयांना रब्बी पिकासाठी हे धरण वरदान ठरत होते. पण, आता पाण्याअभावी सिंचनाची गैरसोय निर्माण झाली आहे. यावेळी खरीपासाठी पहिली पाण्याची पाळी सोडली तेव्हा नसल्यासारखेच पाणी शेतात पोहचले आहे.आष्टी तालुक्यातील २७ गावांना या पाण्याचा लाभ मिळत होता. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. बेलोरा, खंबीत, अंतोरा, माणीकनगर, देलवाडी, जोलवाडी, अंबीकापूर, लहान आर्वी, लिंगापूर, जैतापूर, किन्हाळा, आष्टी, नविन आष्टी, पेठ अहमदपूर, आनंदवाडी, खडकी, चिंंचोली, वाघोली, सिरसोली, भारसवाडा, चिस्तूर, नरसापूर, सुजातपूर, शिरकुटणी, तळेगाव, खडका, बेलोरा (खुर्द) अशा एकूण २७ गावांना धरणाच्या पाण्यामुळे चांगली व्यवस्था होती. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वडाळा, वर्धपूर, झाडगाव, सत्तारपूर येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या जमिनीवर काही शेतकरी पीक घेत होते. खरीप वगळता रब्बी पिकाचा जास्त फायदा व्हायचा. पण, यावर्षी येथेही सिंचनाचा काहीसा फटका बसत आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात एप्रील महिन्याची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.अप्पर वर्धा धरणाच्या संचयीत पाणी साठ्यातील घट लक्षात घेता धरण विभागाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत असलेली पाण्याची साखळी यावर्षी कोलमडली असून सर्वांनाच धक्का देणारी आहे. धरणाच्या परिसरात असलेले पाण्याचे ठिकठिकाणचे लहान डोह सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या दिवसात ही स्थिती आणखी भीषण होईल.