शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

अप्पर वर्धा धरणात २९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:15 IST

दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देमृत जलसाठा ओलांडतोय खालची पातळी : हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विशेषत: मृत जलसाठा आतापासूनच अधिक खालची पातळी गाठत असल्याने ऐन हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.अप्पर वर्धा धरण आष्टी तालुक्याची शान आहे. १९९० पासून या ठिकाणी कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धरणामध्ये जलसाठा झाला नाही. दरवर्षी धरणाचे १३ दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात होते. मात्र यावर्षी धरणाच्या समोरच्या भागातही काहीच पाणी नसल्याने कोरडाठण पाहायला मिळतो. या धरणामधून उर्ध्व वर्धा, डावा कालवा अंतर्गत ३४ कि.मी. पर्यंत पाणी पुरविल्या जाते. शेतकºयांना रब्बी पिकासाठी हे धरण वरदान ठरत होते. पण, आता पाण्याअभावी सिंचनाची गैरसोय निर्माण झाली आहे. यावेळी खरीपासाठी पहिली पाण्याची पाळी सोडली तेव्हा नसल्यासारखेच पाणी शेतात पोहचले आहे.आष्टी तालुक्यातील २७ गावांना या पाण्याचा लाभ मिळत होता. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. बेलोरा, खंबीत, अंतोरा, माणीकनगर, देलवाडी, जोलवाडी, अंबीकापूर, लहान आर्वी, लिंगापूर, जैतापूर, किन्हाळा, आष्टी, नविन आष्टी, पेठ अहमदपूर, आनंदवाडी, खडकी, चिंंचोली, वाघोली, सिरसोली, भारसवाडा, चिस्तूर, नरसापूर, सुजातपूर, शिरकुटणी, तळेगाव, खडका, बेलोरा (खुर्द) अशा एकूण २७ गावांना धरणाच्या पाण्यामुळे चांगली व्यवस्था होती. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वडाळा, वर्धपूर, झाडगाव, सत्तारपूर येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या जमिनीवर काही शेतकरी पीक घेत होते. खरीप वगळता रब्बी पिकाचा जास्त फायदा व्हायचा. पण, यावर्षी येथेही सिंचनाचा काहीसा फटका बसत आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात एप्रील महिन्याची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.अप्पर वर्धा धरणाच्या संचयीत पाणी साठ्यातील घट लक्षात घेता धरण विभागाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत असलेली पाण्याची साखळी यावर्षी कोलमडली असून सर्वांनाच धक्का देणारी आहे. धरणाच्या परिसरात असलेले पाण्याचे ठिकठिकाणचे लहान डोह सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या दिवसात ही स्थिती आणखी भीषण होईल.