शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

अप्पर वर्धा धरणात २९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:15 IST

दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देमृत जलसाठा ओलांडतोय खालची पातळी : हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विशेषत: मृत जलसाठा आतापासूनच अधिक खालची पातळी गाठत असल्याने ऐन हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.अप्पर वर्धा धरण आष्टी तालुक्याची शान आहे. १९९० पासून या ठिकाणी कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धरणामध्ये जलसाठा झाला नाही. दरवर्षी धरणाचे १३ दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात होते. मात्र यावर्षी धरणाच्या समोरच्या भागातही काहीच पाणी नसल्याने कोरडाठण पाहायला मिळतो. या धरणामधून उर्ध्व वर्धा, डावा कालवा अंतर्गत ३४ कि.मी. पर्यंत पाणी पुरविल्या जाते. शेतकºयांना रब्बी पिकासाठी हे धरण वरदान ठरत होते. पण, आता पाण्याअभावी सिंचनाची गैरसोय निर्माण झाली आहे. यावेळी खरीपासाठी पहिली पाण्याची पाळी सोडली तेव्हा नसल्यासारखेच पाणी शेतात पोहचले आहे.आष्टी तालुक्यातील २७ गावांना या पाण्याचा लाभ मिळत होता. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. बेलोरा, खंबीत, अंतोरा, माणीकनगर, देलवाडी, जोलवाडी, अंबीकापूर, लहान आर्वी, लिंगापूर, जैतापूर, किन्हाळा, आष्टी, नविन आष्टी, पेठ अहमदपूर, आनंदवाडी, खडकी, चिंंचोली, वाघोली, सिरसोली, भारसवाडा, चिस्तूर, नरसापूर, सुजातपूर, शिरकुटणी, तळेगाव, खडका, बेलोरा (खुर्द) अशा एकूण २७ गावांना धरणाच्या पाण्यामुळे चांगली व्यवस्था होती. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वडाळा, वर्धपूर, झाडगाव, सत्तारपूर येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या जमिनीवर काही शेतकरी पीक घेत होते. खरीप वगळता रब्बी पिकाचा जास्त फायदा व्हायचा. पण, यावर्षी येथेही सिंचनाचा काहीसा फटका बसत आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात एप्रील महिन्याची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.अप्पर वर्धा धरणाच्या संचयीत पाणी साठ्यातील घट लक्षात घेता धरण विभागाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत असलेली पाण्याची साखळी यावर्षी कोलमडली असून सर्वांनाच धक्का देणारी आहे. धरणाच्या परिसरात असलेले पाण्याचे ठिकठिकाणचे लहान डोह सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या दिवसात ही स्थिती आणखी भीषण होईल.