शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घाटांची 25 टक्के रक्कम कमी; आयुक्तांकडून प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला.  त्यानंतर ३२ घाटांकरिता दुसरी फेरी घेतली असता त्यात समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोनच घाटांचा लिलाव झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलावाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतरही ३० घाटांचा लिलाव न झाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाकडून या घाटांची किंमत २५ टक्के करुन देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता येत्या दोन आठवड्यांमध्ये उर्वरित ३० वाळू घाटांची २५ टक्के रक्कम कमी करुन लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला.  त्यानंतर ३२ घाटांकरिता दुसरी फेरी घेतली असता त्यात समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोनच घाटांचा लिलाव झाला. त्यानंतरही ३० घाटांकरिता तिसरी फेरी घेतली, पण एकही घाट लिलाव झाला नाही. अखेर या ३० घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनी मंजुरी दिली असून, या ३० घाटांचा कमी किमतीमध्ये लिलाव होणार असून, किती घाटधारक सहभागी होतात, हे येणारी वेळच सांगणार.

तिघांंची रक्कम शासन जमा, पुन्हा होणार पूर्ण किमतीत लिलाव-    लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये सालफळ, उमरा-औरंगपूर रिठ, सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला. दुसऱ्या फेरीमध्ये चाकूर आणि शिवणी या दोन घाटांचा लिलाव झाला. लिलावधारकाला लिलावादरम्यान २५ टक्के अनामत रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर महिन्याभरात घाटांची पूर्ण रक्कम शासन जमा करून ताबा घ्यावा लागतो. या सहा घाटधारकांपैकी सावंगी रिठ, ढिवरी (पिपरी) व सालफळ या घाटधारकांनी रक्कम भरलीच नाही. त्यांना १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली होती. तरीही रक्कम भरण्याकडे पाठ फिरविल्याने या तिन्ही घाटांची अनामत रक्कम शासन जमा करण्यात आली. ही रक्कम जवळपास ५८ ते ६० लाखांच्या घरात आहे. आता या तिन्ही घाटांचा पूर्ण किमतीमध्ये लिलाव होणार आहे.

नवीन धोरण लागू होण्याची शक्यता कमीच? -    जिल्ह्यालगतच्या अमरावती, नागपूर व यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळूची  रॉयल्टी ६०० रुपये आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यातील रॉयल्टी ४ हजार १६७ रुपये प्रतिब्रास आहे. पण, हे धोरण वर्ध्यात लागू होण्याकरिता सध्या तरी विलंब होण्याची चिन्ह दिसत आहे. कारण शासकीय नियमानुसार पहिल्या लिलावानंतर दुसरी व तिसरी लिलाव फेरी घेऊनही घाट लिलाव झाले नाही तर त्या घाटांच्या किमती २५ टक्के कमी करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी घेतली जाते. त्यांच्या मंजुरीनंतर पुन्हा लिलावप्रक्रिया राबवून तीनदा लिलाव घ्यावा लागतो. त्यानंतरही लिलावात गेले नाही, तर मग लगतच्या जिल्ह्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. पण, तोपर्यंत पावसाळा लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ३६ वाळू घाटांकरिता लिलावप्रक्रिया राबविण्यात आली होती. यादरम्यान सहा घाटांचा लिलाव झाला असून, ३० घाटांचा फेरलिलाव घेण्यात आला. तिसऱ्या फेरीनंतरही घाटांचा लिलाव न झाल्याने नियमानुसार ३० घाटांची रक्कम २५ टक्के कमी करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, आता लवकरच लिलावप्रक्रिया राबविली जाईल. डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :sandवाळू