शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 4:13 PM

खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, एकेरी वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आहे. अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झालेली दिसून येते.

ठळक मुद्देअपघातांचे प्रमाण चिंताजनक : महामार्गावर सर्वाधिक अपघात

वर्धा : जिल्ह्यातील राज्य महामार्गांसह अन्य मार्ग सध्या साक्षात यमदूत वाटू लागल्याने या खडतर मार्गाने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे.

खड्डेमय रस्त्यांनी मरणच स्वस्त करून टाकले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या काळात तब्बल ३३२ अपघातांच्या घटना घडल्या. त्यामध्ये १५६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. १४१ जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आधारच उद्ध्वस्त झाला आहे. यातील काही जण कुबड्यांच्या सहाऱ्यावर जीवन जगत आहेत तर काही जण कायमचे अंथरुणावर खिळून पडले आहेत.

महामार्गासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच वाहनांची गती आवाक्याबाहेर जात असल्याने प्रवास करणेदेखील जिकिरीचे झाले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडून लोक दगावत आहेत. खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, एकेरी वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या  रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आहे. अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झालेली दिसून येते.

जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२२ अपघातांच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी १४१ अपघात एवढे भीषण होते की त्यामध्ये १५६ जणांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. कुणाला हात तर कुणाला पाय गमवावा लागला आहे. काहींचा तर कमरेखालील भागच निकामी झाला. एकंदरीत घरच्या कर्त्या असलेल्या व्यक्तींना अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत सुरू आहे. वाढत्या अपघातांच्या घटना पाहता लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

खराब रस्ते ठरलेत साक्षात यमदूत

जिल्ह्यात विविध गावांत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे खराब रस्त्यांनी अनेकांचे जीव घेतले असून हे रस्ते साक्षात यमदूत ठरले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर ४७, राज्य महामार्गावर ५८, शहरी भागातील रस्त्यांवर ३२ तर गावखेड्यातील रस्त्यांवर १९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकूण अपघात ३२२

एकूण मृत्यू १५६

गंभीर जखमी १४१

पुरुष मृत्यू १४५

महिला मृत्यू ११

मार्ग     -        मृत्यू

नॅशनल हायवे - ४७

राज्य महामार्ग - ५८

शहरी रस्ते  -     ३२

गाव रस्ते       -  १९

टॅग्स :Accidentअपघातroad transportरस्ते वाहतूक