शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

११२ बचत गटांना वऱ्हाड महोत्सवात देणार १५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे.

ठळक मुद्देसत्यजीत बढे : ८ ते १२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवार ८ ते १२ जानेवारी या कालावधीत लोक महाविद्यालयाच्या मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. यांच्या संयुक्त विद्यमाने वºहाड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याच महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तब्बल ११२ महिला बचत गटांना सुमारे १५ कोटींच्या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.बढे पुढे म्हणाले, विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे. सदर वºहाड महोत्सवाचे उद्घाटन नेमके कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, आमदार, खासदार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.स्वच्छ आणि निरोगी आरोग्याविषयी प्रभावी जनजगृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाचा स्टॉल राहणार असल्याचेही सत्यजीत बढे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाराज्य राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या स्वाती वानखेडे यांची उपस्थिती होती.सेल्फी पॉर्इंट घालणार भूरळवऱ्हाड महोत्सवात विविध खाद्यपदार्थांची मेजवानी राहणार असून बच्चेकंपनींसह नागरिकांना भूरळ घालेल असा एक सेल्फी पॉर्इंट राहणार आहे. या महोत्सवाचा वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सत्यवीर बढे यांनी यावेळी केले.