शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM

जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : आता सण, उत्सवांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विवाह सोहळे, समारंभ आदी सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस व इलेक्ट्रिक यासह संबंधित इतर सेवा व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात १४४ कोटी ३० लाख रुपयांच्या फटक्याने अर्थचक्र प्रभावित झाले आहे.जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी विवाह सोहळे व समारंभाला मुकावे लागले तर आता सण, उत्सवाच्या आयोजनावरही मर्यादा घालण्यात आल्याने या सेवा व्यावसायिकांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. विशेषत: या व्यवसायाशी संलग्न असलेले वाजंत्री, डोलीवाले, रांगोळी, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर, वेटर, मोलकरीण, साफसफाई कर्मचारी आदींसह हजारोंचे रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आली आहे.अनेकांनी मोलमजुरीचा निवडला पर्यायजिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांपैकी ७५ टक्के व्यावसायिक हे ग्रामीण भागातील असून त्यांनी या व्यवसायातून स्वयंरोजगार उभारला आहे. ते स्वत: मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, इलेक्ट्रिकचे काम करतात. खड्डा खोदण्यापासून तर बल्ली गाडून पडदा लावण्याचेही काम ते स्वत: करीत असल्याने या लॉकडाऊनच्या काळात त्यांचास्वयंरोजगारच ठप्प पडला आहे. याचाच परिणाम या व्यवसायातील मजुरांवरही झाला आहे. मंडप कारागीर आणि या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांना मोलमजुरी करावी लागत आहे.सेवा व्यावसायिकनिहाय झालेले नुकसानकोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजारावर असलेल्या सेवा व्यावसायिकांचे यंदा जवळपास दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून त्यांचे हप्ते थकल्याने बँकांकडून नोटीस येत आहेत. शासनाच्या आदेशाने हप्ते थांबविण्यात आले असून व्याज मात्र, सुरूच आहे. या काळात व्याजाचेही चक्र जोरात असल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषत: या व्यवसायावर अवलंबून असणाºया इतर दुर्लक्षित कामगारांचा पोटमारा झाला आहे. ग्रामीण भागात या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारणाऱ्यांची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.संजय ठाकरे, सचिव, वर्धा सेवा समिती.