शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

वीज वितरणचा १३० जणांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:48 IST

विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हे : ११ महिन्यांत ५० लाखांची विद्युत चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे. सोबतच वीज चोरी प्रकरणातील सात जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यापैकी ४ जणांनी रक्कम भरल्याने आता तिघांवरच कारवाई सुरु आहे.घर तिथे वीज असेच समिकरण सध्या पहायला मिळत असल्याने विजेची उधळपट्टीही मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्धा शहर उपविभागातही मोठ्या प्रमाणात विद्यूत वितरणचे ग्राहक असून शहरातही घरघुती मीटरवरुन व्यावसायीक वापर, मीटरमध्ये अदलाबदल करुन वीज चोरी किंवा पोलवर हुक टाकून वीजचोरी केल्या जाते. यात सर्वसामान्यापासून तर धनदांडग्याचाही समावेश आहे. या वीजचोरीमुळे विद्युत वितरण कंपनीला नुकसान सहन करावे लागतात. त्यामुळे वितरणकडे असलेल्या प्रणालीव्दारे विद्युत चोरीची माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर कारवाईचा बडगा उगारल्या जातात. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांनी सहायक अभियंत्यासह शहरात वीज चोरी पकडण्यासाठी मोहीम राबविली. एप्रील २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत १३० ग्राहकांनी ३ लाख ५२ हजार १४० युनिटची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वावर कारवाई करीत त्यांच्याकडून चोरी केलेल्या युनिटबाबत ४४ लाख २३ हजार ८५ रुपये व तडजोड रक्कम ५ लाख ५९ हजार रुपये असे एकूण ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली केली आहे.मीटरमधूनच वीज चोरी करण्याचे प्रमाण अधिकशहरात घरगुती मीटरवरुन ४४ जणांनी व्यावसायिक वापर करीत १९ लाख ८८ हजार ५५० रुपयाच्या ८४ हजार २४५ युनिटची चोरी केली. तसेच मीटरमध्ये हेराफेरी करुन ६९ ग्राहकांनी २ लाख ५३ हजार ८ युनिट वीज चोरली आहे. त्यांच्याकडून २३ लाख १३ हजार ५४५ रुपयांसह ५ लाख २१ हजार तडजोड रक्कम वसूल केली. १७ ग्राहकांनी हुक टाकून १४ हजार ८८७ युनिट वीज चोरल्याने त्यांच्याकडून १ लाख २० हजार ९९० रुपयांसह ३८ हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल केली. या आकडेवारीवरून मीटरमध्ये हेराफेरी करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.विद्युत मीटरचा तुटवडाही कारणीभूतग्राहकांने डिमांड भरून विद्युत मीटरकरिता अर्ज केला असता त्याला नियोजित कालावधीत मीटर पुरविले जात नाही. विद्युत वितरण कंपनीकडे मीटरचा तुटवडा असल्याने ग्राहकांना वेळेत मीटर मिळत नाही. त्यामुळे काही कर्मचारीच ग्राहकांना डायरेक्ट लाईन घेण्याचा सल्ला देतात. तर काही कर्मचारीच विद्युत मीटरमध्ये हेराफेरी करुन देत वीज चोरीचा मार्ग दाखवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्राहकांना काही कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्यानेच वीजचोरीचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: बड्याहस्तींना अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद मिळत आहे. कुणी तक्रार केल्यावरच अधिकारी जागे होतात आणि कारवाईचा दिखावा करीत आपले हितसंबंध जोपासत असल्याचेही निदर्शनास येते.विद्युत चोरीचा मोठा फटका बसत असल्याने अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनात सर्व उपविभागात मोहीम राबविली जाते. वर्धा शहर उपविभागातही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत एप्रील २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत १३० ग्राहकांनी ३ लाख ५२ हजार १४० युनिटची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुध्द कारवाई करीत एकूण देयकाची रक्कम व तडजोड रक्कम वसुल केली आहे. यापुढेही ही मोहीम सुरु राहणार आहे.- नरेश पारधी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वर्धा शहर उपविभाग.

टॅग्स :electricityवीज