शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

१० रुपयांत मिळणार पोटभर जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:42 IST

महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे.

ठळक मुद्देवर्धा शहरात पालिकेकडून रसोई प्रस्तावित : ११ महिन्यांकरिता सामाजिक संस्थेला ठेका

रूपेश खैरी ।आॅनलाईन लोकमतवर्धा : महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे. त्यांनी १० रुपयांत जेवण देणारी रसोई निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्सम प्रस्ताव नगर परिषदेच्या सभेत सादर करण्यात येणार असून एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत तो नाकारला जाणार नाही, अशी त्यांची अपेक्षा आहे.सर्वसामान्यांना पोटभर जेवण देण्याकरिता कार्यरत असलेली ही रसोई नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या नावावर निर्माण झालेल्या खंडरात सुरू होणार आहे. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कल्पनेतील या रसोईला प्रारंभी ११ महिने सांभाळण्याकरिता एका संस्थेकडून होकार आला आहे. यामुळेच ही कल्पनेतील रसोई वास्तवात उतरणार असल्याचे चित्र आहे. असे झाल्यास मुंबईतील आमदार निवासातील खाणावळीनंतर कमी पैशात जेवण देणारी वर्धेतील रसोई एकमेव ठरणार आहे.नगराध्यक्षांकडून या रसोईचा प्रस्ताव रामनवमीनंतर पालिकेच्या सभागृहात येणार आहे. येथून प्रस्तावावर एकमत होताच कामाला प्रारंभ होणार आहे. महिनाभरात पालिकेची ही रसोई सर्वसामान्यांना कमी पैशात पोटभर जेवण देण्याकरिता तयार होणार आहे. या रसोईतून पालिकेच्या तिजोरीवर कोणताही भुुर्दंड बसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. उलट यातून काही ना काही प्रमाणात पालिकेला लाभ होणार आहे. ही रसोई निर्माण होताच शहरात असलेल्या या खंडरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल आणि सर्वसामान्यांना कमी पैशात जेवणही उपलब्ध होणार आहे.सार्वजनिक ठिकाणी फिरणार रसोईची गाडीवर्धा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून अनेकजण शासकीय कामाकरिता येतात. या कामाला येताना लागणाऱ्या तिकिटात आणि शासकीय कार्यालयात अलिखित नियमामुळे पैसे देण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या खिशात महागड्या हॉटेलात जाऊन नाश्ता करण्याची त्यांची सोय नसते. अशांना अत्यल्प दरात जेवण देण्याचे काम या रसोईकडून होणार आहे.रसोईची ही गाडी शहरातील रेल्वे, बसस्थानक, शासकीय कार्यालय यासह आसपासच्या परिसरात फिरणार आहे. येथेही नागरिकांना रसोईचा लाभ मिळणार आहे.खंडराची समस्या निकाली निघेलवर्धा शहरात ठाकरे मार्केट परिसरात असलेल्या मैदानात सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार कामाचा शुभारंभ झाला. कामही सुरू झाले. मोठी रक्कम खर्च झाली; पण सभागृहाची इमारत पूर्णत्त्वास गेली नाही. परिणामी, शहराच्या मध्यभागी एक खंडर निर्माण झाले. येथे कमालीची अस्वच्छता पसरली असून त्याचा त्रास परिसरात असलेल्या शाळांनाही होत आहे. या खंडरात जर ही रसोई निर्माण झाली तर खंडराचीही समस्या मार्गी लागणार आहे.नागरिकांना १० रुपयांत पोटभर जेवण देण्याकरिता रसोई सुरू करण्याची संकल्पना आहे. यात पालिकेच्या तिजोरीवर कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. उलट त्यातून निधी संकलीत होणार आहे. या रसोईचा पहिला ११ महिन्यांचा भार उचलण्याकरिता एक सामाजिक संस्था तयार आहे. हा प्रस्ताव लवकरच पालिकेच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. तो मंजूर होण्याची अपेक्षा आहे. मंजुरी मिळताच एका महिन्यात या रसोईतून जेवण मिळेल, असे अपेक्षित आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.