उत्तर प्रदेशातील गावांमध्ये सध्या एक शांत पण शक्तिशाली सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडताना दिसत आहे. स्थानिक 'चेंजमेकर' आत्मविश्वासाने नेतृत्व करत आहेत. यामुळे दैनंदिन समस्या विकासाच्या संधींमध्ये परावर्तित होत आहेत. शेतीत नावीन्य, वित्तीय समावेशकता आणि आरोग्य उपक्रमांद्वारे, समुदायांना स्वतः नेतृत्व करण्याचा अधिकार मिळाला की प्रगती कशी साधता येते, हे या लोकांनी सिद्ध केले आहे.
कचऱ्यातून सोनं: अलीगढच्या महिला शेतकऱ्यांचा प्रयोग -अलीगढच्या टप्पल ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या भरतपूर गावात, टप्पल समृद्धी महिला किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (FPO) या महिला-नेतृत्वाखालील संस्थेमुळे कचऱ्याचे रूपांतर सोन्यात होत आहे. १,००० हून अधिक महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, पंचायतीच्या जागेवरील जैव खत युनिटमध्ये कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यास सुरुवात केली आहे. नीलम देवी यांच्या नेतृत्वाखाली, या महिला गायीचे शेण आणि इतर अवशेष वापरून IIT कानपूर-विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढले आहे. या युनिटचे संचालन, वित्तीय व्यवस्थापन आणि महत्त्वाचे निर्णय महिला स्वतः घेतात, जो एक खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाचा मंच ठरला आहे.
ई-रिक्शा चालक 'चंदा'ने १०० हून अधिक महिलांना दिला आधारमीरझापूर येथील ३३ वर्षीय चंदा शुक्ला यांनी ई-रिक्शा चालवून 'चालत्या-फिरत्या' परिवर्तनाचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन ई-रिक्शा खरेदी केला. यानंतर त्यांनी केवळ दोन वर्षांत कर्ज फेडले नाही, तर १०० हून अधिक महिलांना ड्रायव्हिंग आणि वाहन देखभालीचे प्रशिक्षणही दिले. हे सर्व वाटते तेवढे सोपे नव्हते. 'आर्या महिला समूहा'चे नेतृत्व करणाऱ्या चंदा आता आणखी एक ई-रिक्शा आणि एक चारचाकी घेण्याची योजना आखत आहेत.
आरोग्य आणि वित्तीय क्रांतीहरदोई येथील २५ वर्षीय शेतकरी हिमांशु यादव यांनी अँटी-फायलेरिअल औषधाच्या दुष्परिणामांना सकारात्मकतेने घेऊन, फायलेरिया निर्मूलन मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. 'नाईट चौपाल'द्वारे त्यांनी १३० हून अधिक गावकऱ्यांना औषध घेण्यास प्रेरित केले.
दुसरीकडे, अमेठीच्या अनिता देवी 'बीसी सखी' बनल्या आहेत. त्यांनी गावपातळीवर डोअरस्टेप बँकिंग सेवा सुरू करून १,१०० हून अधिक लोकांना औपचारिक वित्तीय प्रणालीशी जोडले आहे. त्यांचे मासिक कमिशन सुमारे ₹२५,००० असून, आता त्या कुटुंबाच्या ८०% उत्पन्नात योगदान देतात. त्यांची मुले प्रायव्हेट शाळेत शिकतात आणि पती स्थानिक बाजारात कृषी इनपूटचे दुकान चालवतात. महत्वाचे म्हणजे, आता त्यांना रोजगारासाठी शहरांत स्थलांतर करावे लागत नाही.
Web Summary : Uttar Pradesh villagers, empowered by the Yogi government, are driving change. Women in Aligarh are creating fertilizer from waste. A Mirzapur woman empowers others with e-rickshaw training. Individuals in Hardoi and Amethi champion healthcare and financial inclusion, improving lives.
Web Summary : योगी सरकार द्वारा सशक्त, उत्तर प्रदेश के ग्रामीण बदलाव ला रहे हैं। अलीगढ़ में महिलाएं कचरे से खाद बना रही हैं। मिर्जापुर की एक महिला ई-रिक्शा प्रशिक्षण से दूसरों को सशक्त बनाती है। हरदोई और अमेठी के व्यक्ति स्वास्थ्य सेवा और वित्तीय समावेशन को बढ़ावा दे रहे हैं, जिससे जीवन बेहतर हो रहा है।