शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

वकील आणि त्याच्या मुलांनी केली महिला वकिलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 08:56 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिला वकिलाचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह त्याचे तीन मुलगे आणि दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिला वकिलाचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह त्याचे तीन मुलगे आणि दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. महिला वकील मोहिनी तोमर हिचं अपहरण झाल्यानंतर एका दिवसानंतर तिचा मृतदेह कालव्यात सापडला होता. या घटनेनंतर राज्यातील वकिलांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचा दबाव पोलिसांवर होता. दरम्यान, या हत्ये प्रकरणी पकडण्यात आलेला आरोपी मुस्तफा कामिल याच्या मुलाच्या जामिनास विरोध केल्याने आपल्या पत्नीला धमक्या देण्यात येत होत्या, असा आरोप या महिला वकिलाच्या पतीने केला आहे.  

मोहिनी हिचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा पती बिजेंद्र तोमर यांनी वकील मुस्तफा कामिल (६०) त्यांचा पुत्र असद मुस्तफा, हैदर मुस्तफा, सलमान मुस्तफा आणि दोन सहकारी मुनाजिर रफी आणि केशव मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली होती. 

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुस्तफा कामिल आणि त्यांच्या तीन मुलांना रविवारी अटक करण्यात आली आहे. तर रफी आणि मिश्रा यांना सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींनी माझ्या पत्नीला कासगंज येथील कोर्टरूमच्या बाहेर बोलावले. तसेच तिथून अपहरण केले. त्यानंतर ते तिला अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आणि तिची हत्या केली, असा आरोप मृत महिला वकिलाच्या पतीने केला. 

त्यांनी आरोप केला की, एका जुन्या प्रकरणामद्ये मुस्तफा कामिल यांच्या मुलांच्या जामीन अर्जाला विरोध केल्यानंतर माझी पत्नी खूप तणावाखाली होती. आरोपींकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची माहिती माझ्या पत्नीने मला दिली होती, असेही या महिला वकिलाच्या पतीने सांगितले. दरम्यान, कासगंजच्या एसपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये नावं असलेल्या सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश