शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 19:09 IST

कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली.

UP News:उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. घोसी रेल्वे स्थानकाजवळ ईदगाहची भिंत कोसळल्याने सुमारे 21 महिला आणि मुले ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, इतरांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळाजवळ एका कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचे विर्झन पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अचानक ईदगाहची भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात तीन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. 

आतापर्यंत 21 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी किती महिला आणि मुले आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मऊ एसपी अविनाश पांडे यांनी सांगितले की, 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस