शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 11:28 IST

Raja Bhaiyya News: उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. राजा भैय्या यांनी आपल्या भाषणामधून अयोध्येत बांधलेले राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. आदि शंकराचार्यांनंतर जर कुणी सनातन धर्माच्या उत्कर्षाचं काम करत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राजा भैय्या यांनी काढले आहेत.

सभागृहातील आपल्या भाषणामध्ये राजा भैय्या म्हणाले की, डॉ. लोहिया यांना मानणाऱ्या लोकांनाही माहिती आहे की, सामान्य लोक दरवर्षी रामायण यात्रेचं आयोजन करायचे. बाबर, गझनी, औरंगजेब हे लुटारू होते, रसखान आणि रहिम हे आमचे पूर्वज होते, असे लोहिया सांगायचे, असा दावाही राजा भैय्या यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्द्वानीमध्ये हे दिसून आले आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, भिंतीवर घुमट बांधल्याने ही गंगा जमनी तहजीब नाही आहे, हे स्पष्ट होत आहे. राम मंदिरी, काशी विश्वनाथ मंदिर आमि कृष्ण जन्मभूमीला आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केलेले आहे.

राजा भैय्या पुढे म्हणाले की, व्यास जींच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. एक ना एक दिवस असं सरकार येईल, जे तळघराला लागलेले कुलून उघडेल या विश्वासाने ३१ वर्षे चावी सांभाळून ठेवणाऱ्या त्या पुजाऱ्याला आम्ही प्रणाम करतो.  आम्ही मुस्लिमांसोबत राहू शकत नाही, असं कुठल्याही हिंदूने म्हटलेलं नाही. जो कुणी संकटात सापडला आहे, त्याला आम्ही जवळ केलं आहे. श्री रामाचं मंदिर आमच्या काळात उभं राहतंय, हे आमच्या पिढीचं भाग्य आहे, असेही राजा भैय्या म्हणाले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्व