शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 11:28 IST

Raja Bhaiyya News: उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. राजा भैय्या यांनी आपल्या भाषणामधून अयोध्येत बांधलेले राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. आदि शंकराचार्यांनंतर जर कुणी सनातन धर्माच्या उत्कर्षाचं काम करत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राजा भैय्या यांनी काढले आहेत.

सभागृहातील आपल्या भाषणामध्ये राजा भैय्या म्हणाले की, डॉ. लोहिया यांना मानणाऱ्या लोकांनाही माहिती आहे की, सामान्य लोक दरवर्षी रामायण यात्रेचं आयोजन करायचे. बाबर, गझनी, औरंगजेब हे लुटारू होते, रसखान आणि रहिम हे आमचे पूर्वज होते, असे लोहिया सांगायचे, असा दावाही राजा भैय्या यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्द्वानीमध्ये हे दिसून आले आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, भिंतीवर घुमट बांधल्याने ही गंगा जमनी तहजीब नाही आहे, हे स्पष्ट होत आहे. राम मंदिरी, काशी विश्वनाथ मंदिर आमि कृष्ण जन्मभूमीला आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केलेले आहे.

राजा भैय्या पुढे म्हणाले की, व्यास जींच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. एक ना एक दिवस असं सरकार येईल, जे तळघराला लागलेले कुलून उघडेल या विश्वासाने ३१ वर्षे चावी सांभाळून ठेवणाऱ्या त्या पुजाऱ्याला आम्ही प्रणाम करतो.  आम्ही मुस्लिमांसोबत राहू शकत नाही, असं कुठल्याही हिंदूने म्हटलेलं नाही. जो कुणी संकटात सापडला आहे, त्याला आम्ही जवळ केलं आहे. श्री रामाचं मंदिर आमच्या काळात उभं राहतंय, हे आमच्या पिढीचं भाग्य आहे, असेही राजा भैय्या म्हणाले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्व