शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:40 IST

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.

राहुल गांधी आणि प्रियांकां गांधी दर 3 महिन्याला परदेशात सुट्टीवर जातात. प्रियांका गांधी नुवडणूकीच्या काळात थायलंडमधून सुट्टीवर जाऊन आल्या. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी गेल्या 23 वर्षांत दिवाळीलाही सुट्टी घेतलेली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 20 एप्रिलला राजस्थानातील भीलवाडा येते म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी भडकल्या आहेत. "जर त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, तर मग ते खोटं का बोलता आहेत? असा प्रश्न विचारत, आपण आपल्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेलो होतो. जे अमित शाह प्रचारसभांमध्ये सांगत आहेत," असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. गांधी कुटुंब केवळ निवडणुकीसाठीच अमेठी आणि रायबरेलीमध्ये येते, असा आरोप भाजप करत आहे. या आरोपावर बोलतान प्रियांका म्हणाल्या, "हे अजिबात खरे नाही. अमित शाह यांना तर बऱ्याच गोष्टी माहीत असतात.  विशेषत: महिलांबद्दल. त्या कुठे जातात, कोणाला भेटतात? काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते. जे ते त्यांच्या निवडणूक सभेत सांगत होते. पण अमित शहा यांनी सांगावे, की त्यांना ही माहिती कशी मिळाली? जर त्यांना सर्व माहिती असते, तर मग खोटं का बोलतात"

रविवारी रायबरेली येथील सभेत अमित शहा यांनी आरोप केला होता की, सोनिया गांधी यांनी खासदार निधीतील 70 टक्के निधी अल्पसंख्यकांवर खर्च केला. रायबरेली गेल्या अनेक वर्षांपासून नेहरू-गांधी घराण्याला विजयी करत आहे. मात्र, सोनिया गांधी अथवा त्यांचे कुटुंबीय निवडणूक जिंकल्यानंतर कितीवेळा रायबरेलीमध्ये येतात. रायबरेलीमध्ये तीन डझनवर मोठे अपघात झाले पण गांधी कुटुंब आले का? असा सवालही शाह यांनी यावेळी केला. तसेच, भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

रायबरेली आणि अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होत आहे. 18 मे रोजी येथे निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावतील. अमेठीमध्ये भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीचे तीन वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी यावेळी केरळमधील वायनाड आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली जागेवरून लढत आहेत. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा 55 हजार मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीElectionनिवडणूक 2024Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस