शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:40 IST

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.

राहुल गांधी आणि प्रियांकां गांधी दर 3 महिन्याला परदेशात सुट्टीवर जातात. प्रियांका गांधी नुवडणूकीच्या काळात थायलंडमधून सुट्टीवर जाऊन आल्या. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी गेल्या 23 वर्षांत दिवाळीलाही सुट्टी घेतलेली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 20 एप्रिलला राजस्थानातील भीलवाडा येते म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी भडकल्या आहेत. "जर त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, तर मग ते खोटं का बोलता आहेत? असा प्रश्न विचारत, आपण आपल्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेलो होतो. जे अमित शाह प्रचारसभांमध्ये सांगत आहेत," असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. गांधी कुटुंब केवळ निवडणुकीसाठीच अमेठी आणि रायबरेलीमध्ये येते, असा आरोप भाजप करत आहे. या आरोपावर बोलतान प्रियांका म्हणाल्या, "हे अजिबात खरे नाही. अमित शाह यांना तर बऱ्याच गोष्टी माहीत असतात.  विशेषत: महिलांबद्दल. त्या कुठे जातात, कोणाला भेटतात? काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते. जे ते त्यांच्या निवडणूक सभेत सांगत होते. पण अमित शहा यांनी सांगावे, की त्यांना ही माहिती कशी मिळाली? जर त्यांना सर्व माहिती असते, तर मग खोटं का बोलतात"

रविवारी रायबरेली येथील सभेत अमित शहा यांनी आरोप केला होता की, सोनिया गांधी यांनी खासदार निधीतील 70 टक्के निधी अल्पसंख्यकांवर खर्च केला. रायबरेली गेल्या अनेक वर्षांपासून नेहरू-गांधी घराण्याला विजयी करत आहे. मात्र, सोनिया गांधी अथवा त्यांचे कुटुंबीय निवडणूक जिंकल्यानंतर कितीवेळा रायबरेलीमध्ये येतात. रायबरेलीमध्ये तीन डझनवर मोठे अपघात झाले पण गांधी कुटुंब आले का? असा सवालही शाह यांनी यावेळी केला. तसेच, भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

रायबरेली आणि अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होत आहे. 18 मे रोजी येथे निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावतील. अमेठीमध्ये भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीचे तीन वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी यावेळी केरळमधील वायनाड आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली जागेवरून लढत आहेत. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा 55 हजार मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीElectionनिवडणूक 2024Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस