शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कुंभमेळ्यात एका नावाडी कुटुंबानं ४५ दिवसांत कमावले ₹३० कोटी, CM योगींनी विधानसभेत सांगितली 'सक्सेस स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:40 IST

या कुटुंबाने कुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी, कुंभमेळ्याच्या आयोजनातून राज्याला एकूण तीन लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे सांगत, त्यांनी, विविध क्षेत्रातील कमाईचीही माहितीही दिली. दरम्यान, त्यांनी प्रयागराज येथील एका नावाडी कुटुंबाची यशोगाथाही सांगितली. या कुटुंबाने कुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

या नावाडी कुटुंबाची यशोगाथा अथवा सक्सेस स्टोरी सांगताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "समाजवादी पक्षाचे लोक सातत्याने म्हणत होते की, तेथे (प्रयागराज) नावाडी समाजाचे शोषण होत आहे. त्यांना पैसे कमवू दिले जात नाहीत. मात्र, वास्तव अगदी वेगळे आहे. तेथील एका नावाडी अथवा खलाशी कुटुंबाकडे १३० बोटी आहेत. एका बोटीने सुमारे २३ लाख रुपये कमावले आहेत. जर आपण रोजच्या बचतीचा विचार केला तर एका बोटीने जवाळपास ५० ते ५२ हजार रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, संपूर्ण कुटुंबाने केवळ ४५ दिवसांतच ३० कोटी रुपये कमावले आहेत."

मुख्यमंत्री योगी म्हणाले, "आपण २७ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याच्या समारोपासाठी तिथे (प्रयागराज) गेलो होतो. प्रथम गंगा मातेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि तिचे पूजन केले. यानंतर आपण तेथील नावाडी समाजाच्या लोकांसोबत संवाद साधला. त्यांच्यासाठी एक पॅकेजही जाहीर करण्यात आले. 

योगी पुढे म्हणाले, आम्ही 'सबका साथ, सबका विकास'वर बोलतो. ४५ दिवसांच्या या कार्यक्रमाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात भारताच्या वारशाची आणि विकासाची एक अनोखी छाप सोडली आहे. कुंभमेळ्याचे आयोजन करणे, ही आमच्यासाठी एक कठीण परीक्षा होती. केंद्र आणि राज्य सरकार यात यशस्वी झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचा प्रतिध्वनी जगभरात दीर्घकाळ ऐकायला मिळेल.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा