'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:32 IST2025-09-26T11:31:13+5:302025-09-26T11:32:05+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'Mission Shakti 5.0' a blast! 12 missing people found in just 3 days; Yogi government praises police | 'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी

'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी हरवलेले, भरकटलेले असे एकूण १२ मुले, मुली आणि महिलांना शोधून काढले आहे. पोलिसांनी या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले असून, आपल्या आप्तजनांना परत भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

हरवलेली मुले मिळाली, कुटुंबियांचे चेहरे फुले!

डीजीपी राजीव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 'मिशन शक्ती ५.०' मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष सर्च ऑपरेशन राबवले गेले.

या अभियानात मिळालेल्या यशामुळे लखनऊच्या जानकीपुरममधील ३ वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. याचप्रमाणे, अमरोहाच्या गजरौला येथील एक मुलगा, बरेलीच्या भमोरा येथील ६ वर्षांची मुलगी, बलरामपूरच्या रेहरा बाजार येथील एक मुलगी आणि मुरादाबादच्या रामलीला मैदानात सापडलेल्या एका मुलालाही पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

तीन अल्पवयीन मुलींना परत मिळाले घर!

डीजीपींनी पुढे सांगितले की, या मोहिमेत अनेक भावनाविवश घटना समोर आल्या. संतकबीरनगर येथे घरगुती वाद आणि पैशांच्या तणावामुळे व्यथित झालेली ज्ञानवती देवी नावाच्या महिलेने आपल्या लहान मुलीला पुलावर सोडून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या महिलेला समजावून नदीत उडी घेण्यापासून थांबवले. त्यांना सुरक्षितपणे चौकीत आणून आई आणि मुलीला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

याशिवाय, बलियाच्या बांसडीहरोड येथे कुटुंबावर रागावून घर सोडून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले. बस्ती रेल्वे स्टेशनवर संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका महिलेलाही शोधून तिच्या कुटुंबाकडे सोपण्यात आले. तसेच, महाराजगंज येथे ५ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना, तर मऊच्या दोहरीघाट परिसरात तीन अल्पवयीन मुलींना शोधून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

आपल्या प्रियजनांना परत भेटल्यामुळे हरवलेल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी पोलीस प्रशासनाचे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'मिशन शक्ती' अभियानाचे मनापासून आभार मानले.

Web Title : मिशन शक्ति 5.0: यूपी पुलिस ने 3 दिनों में 12 लापता लोगों को ढूंढा

Web Summary : मिशन शक्ति 5.0 के तहत, उत्तर प्रदेश पुलिस ने सिर्फ तीन दिनों में बच्चों और महिलाओं सहित 12 लापता व्यक्तियों का पता लगाया। पुनर्मिलन से परिवारों में अपार खुशी आई। सीएम योगी के निर्देश पर केंद्रित पहल सुरक्षा और समर्थन पर केंद्रित है।

Web Title : Mission Shakti 5.0: UP Police Find 12 Missing People in 3 Days

Web Summary : Under Mission Shakti 5.0, Uttar Pradesh police located 12 missing individuals, including children and women, in just three days. Reunions brought immense joy to families. The initiative, directed by CM Yogi, focuses on safety and support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.