शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

गंगामाई पाहुणी म्हणून आली अन्...; उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:41 IST

४०२ गावांमधील ८४,३९२ लोकांना मोठा फटका; प्रयागराज, वाराणसीमध्ये स्थिती गंभीर; बिहारसह इतर राज्यांतही मुसळधार

पाटणा/नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले असून उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८० हजारहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. ३७ तहसील आणि ४०२ गावांमधील ८४,३९२ लोक पुरामुळे बाधित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.  

गंगा नदीला पूर आल्याने तीने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. प्रयागराज, वाराणसी, इटावासह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर आहे. यामुळे अनेक नागरिकांची घरे बुडाली आहेत. राजस्थानातही हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस सुरू आहे.

हिमाचलमध्ये ३०७ मार्ग बंदहिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह ३०७ रस्ते बंद असून, दोन दिवस या राज्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. आसाममध्येही दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आधुनिक युगातले ‘वासुदेव’उत्तर प्रदेशात पडत असलेल्या मुसळधार पावसाने सखल भागांतील अनेक घरे पाण्यात आहेत. रस्त्यांवरही छातीइतके पाणी होते. या पाण्यात एका तरुण दाम्पत्याने पोटच्या बाळाला उचलून धरत असा मार्ग काढला. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि अनेकांना आधुनिक युगात श्रीकृष्ण काळातील ‘वासुदेव’ आठवले. नागरिकांनी स्थानिक प्रशासनावर याबद्दल टीका केली आहे.

वाहतूक विस्कळीतमध्य प्रदेशातील ९ जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तराखंडमध्ये डेहराडून-बागेश्वर भागांत रविवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे ६४ रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

बिहारमध्ये दिवसभर पाऊसराज्यात रविवारी दिवसभर १६ जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू होती. सायंकाळपर्यंत अनेक भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. पाटण्यात दिवसभराच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

प. बंगालमध्ये नद्यांना पूरराज्यात तिस्ता आणि जलढाकासह इतर नद्यांना पूर आला असून, यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. राज्याच्या उत्तरेत पावसाचा अधिक परिणाम झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार दुपारपर्यंत या भागात दमदार पावसाची शक्यता आहे.

अंगणात नव्हे तर घरातच आलेल्या गंगेचे पूजनप्रयागराजमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी सखल भागात साचले आहे. दारागंज येथे राहणारे उपनिरीक्षक चंद्रदीप निषाद पाण्याखाली गेलेल्या त्यांच्या घराच्या दारातच गंगा पूजन करताना दिसत आहेत.गणवेशातील अधिकारी गंगेला आधी फुले वाहतात आणि नंतर दूध अर्पण करतात. ते म्हणतात, “जय गंगा मैया! तुम्ही माझ्या दाराशी आलात यासारखे भाग्य कोणते.” उत्तर भारतात गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने, अनेक गावे बाधित झाली आहेत. 

टॅग्स :floodपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस