शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीनेच बिहारला अराजकता व गुंडागर्दीच्या दरीत ढकलले; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:26 IST

राजद आणि काँग्रेसची सरकारे असताना बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांच्यामुळे बिहार साक्षरतेच्या बाबतीत मागे ढकलले गेले, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्ला चढवला. “घराणेशाही व्यवस्थे'ने बिहारमध्ये जाती-जातींमध्ये भांडणं लावून अराजकता आणि गुंडागर्दीच्या दरीत ढकलले. बिहारच्या तरुणांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. इथल्या गरिबांना उपाशी ठेवण्यात आलं, तर सरकारी खजिन्याची लूट करण्यात आली. मोठमोठ्या घोषणा करत राजद-काँग्रेसची महाआघाडी फसवणूक करण्यासाठी आलेली आहे. जे तुमची जमीन हडपतात, ते नोकऱ्या काय देणार? जनावरांचा चारा खाणारे विकासाच्या गप्पा मारत आहेत. विकास, गरिबांचं कल्याण आणि श्रद्धेचा सन्मान हे कधीच त्यांच्या अजेंड्यावर नव्हतं", अशी टीका मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापूरच्या लक्ष्मी रघुनाथ सिंह उच्च विद्यालयाच्या मैदानावर सभेत बोलत होते. 

“काँग्रेस-राजदने बिहारला जंगलराज दिले”

मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिहार ही भक्ति, शक्ति आणि ज्ञानाची भूमी आहे. नालंदा विद्यापीठासारख्या संस्थेने जगाला ज्ञान दिले, पण काँग्रेस आणि राजदच्या पापांमुळे बिहार साक्षरतेत सर्वात खालच्या स्थानी पोहोचला. त्यांच्याच सरकारच्या काळात बिहार ‘जंगलराज’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं."

"१४ नोव्हेंबरला जेव्हा ईव्हीएमचे बटण दाबले जातील, तेव्हा संपूर्ण बिहारमध्ये ‘फिर एक बार एनडीए सरकार’चा नारा घुमेल”, असा विश्वाास योगी आदित्यानाथ यांनी व्यक्त केला. 

"खानदानी माफियांना सत्ता देऊ नका"

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हे खानदानी लूट करणारे पुन्हा सत्तेत यायचा प्रयत्न करत आहेत. ते बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणू इच्छितात. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही आधी सुरक्षा दिली, मग विकास केला. गुंडागर्दी करणाऱ्यांना यमराजाचे तिकीट देण्याचे आम्ही ठरवलं आहे. बुलडोजर चालला की रस्ते बनतात, विकास वाढतो आणि माफियांची हाडं तुटतात", असा हल्ला त्यांनी केला. 

"राजदच्या काळात बिहारमध्ये ३० हजारांहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या. व्यापारी, डॉक्टर, अभियंते, मुली कोणीही सुरक्षित नव्हतं. मागील २० वर्षांत बिहारमध्ये सुशासनाची पायाभरणी झाली आहे. आज बिहारचा तरुण सनदी सेवेमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि स्वतःच्या स्टार्टअपमधून जगभरात नाव कमावत आहे. ही विकासाची गती अखंड सुरू राहिली पाहिजे", असे आवाहन योगींनी केले. 

"राम-जानकी मार्गाने बिहारचा गौरव वाढतोय"

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारल्यानंतर एनडीए सरकार आता सीतामढीमध्ये माता जानकीचे मंदिर उभारत आहे. अयोध्या-सीतामढी मार्गासाठी ६,१५५ कोटी दिले आहेत. राम-जानकी मार्ग बांधला जातोय. काँग्रेस आणि राजद कधीच हे करू शकले नसते. त्यांनी भारत, संत आणि सामान्य जनतेचा अपमान केला. ते म्हणतात राम-कृष्ण झालेच नाहीत", अशी टीका योगींनी काँग्रेस आणि राजदवर केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dynasty Politics Pushed Bihar into Anarchy: Yogi Adityanath Attacks RJD, Congress.

Web Summary : Yogi Adityanath criticized dynastic politics for Bihar's woes, citing corruption and lawlessness under RJD and Congress. He highlighted NDA's development and Ram Mandir initiatives, contrasting it with the alleged misrule of previous governments, urging voters to support NDA for continued progress.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस