शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

...अन् वाघोबा बनला निवडणुकीचा मुद्दा; पाच वर्षांत २२ हून अधिक गावकरी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:10 IST

पिलीभीतमध्ये केली पाच वर्षांत २२ हून अधिक गावकऱ्यांची शिकार

पिलीभीत (उत्तर प्रदेश) : राजकीय नेते निवडणूक प्रचारसभांमध्ये विकास, आधुनिकीकरण आणि प्रगतीची आश्वासने देत असोत, पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील सुमारे ३०० गावांतील नागरिकांचा अजूनही मानवजातीचा सर्वांत आदिम संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष म्हणजे माणूस आणि वन्यप्राणी संघर्ष.

बेंगाल टायगरचा (पॅन्थेरा टायग्रिस) अधिवास असलेल्या लगतच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी ग्रामस्थांचा संघर्ष नित्याचाच आहे. कधी कधी या चकमकी जीवघेण्याही ठरतात. अधिकृत नोंदीनुसार, नोव्हेंबर २०१९ पासून या गावांतील २२ हून अधिक लोकांना वाघांनी ठार मारले आहे. नुकतेच ९ एप्रिलला भाजप उमेदवार जितीन प्रसाद यांच्या समर्थनार्थ पुरणपूर भागात राजकीय प्रचारसभा होण्याच्या काही तास आधी ५५ वर्षीय शेतकरी भोले राम यांना वाघाने जखमी केले. गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात भोले रामसह चारजणांचा या गावात मृत्यू झाला आहे. 

नेत्यांची आश्वासने सुरू- पिलीभीतमध्ये या मृत्यूमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. - वाघांमुळे कायमच अस्तित्व धोक्यात आलेल्या गावकऱ्यांकडून वाघांना जंगलाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. - राजकीय पक्षांनाही याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि आश्वासने सुरू झाली आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Tigerवाघ