शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:15 IST

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली.

लखनौ - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज आझाद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले. पोलीस व सत्ताधाऱ्यांचं संरक्षण असल्यामुळेच आत्तापर्यत आरोपी पकडले गेले नाहीत, असेही आझाद यांनी म्हटले. 

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला असता, त्यांनी हल्ल्याबाबत सांगताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. आरोपींना सत्तेचं, मुख्यमंत्र्यांचं संरक्षण असल्याचं ते म्हणाले.  

हा आजचा हल्ला नाही, वंचितांवर पूर्वीपासूनच असे हल्ले होत आहेत. हा कोणी पहिला वंचित नाही, ज्यावर हल्ला झाला. अशा अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गेलाय. देशात कायद्याचं राज्य आहे, आज माझ्यासारख्या वंचितावर हल्ला झालाय. म्हणजे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. याप्रकरणी गेल्या २४ तासांत काय कारवाई झाली, असा सवाल चंद्रशेखर आझाद यांनी विचारला आहे. मी जीवन-मरणाची लढाई लढत होतो, पण आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. हे सत्तेच्या संरक्षणाशिवाय होऊच शकत नाही. पोलिसांची इंटेलिजन्स कुठे आहे, काय माहिती आहे त्यांच्याकडे, त्यांच्याकडे तर मोठी सुत्रं असतात. मग, आत्तापर्यंत आरोपी का पकडले नाहीत, असा सवाल चंद्रशेखर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारला आहे. तसेच, मी कोणी राणीचा मुलगा नाही, हा कुठल्या आयुक्तांशी संबंधित विषयही नाही. मी वंचितांचा मुलगा आहे, म्हणून काय फरक पडतो, असंच यांना वाटतंय. तसेच, आरोपींना मुख्यमंत्र्याचं संरक्षण आहे, कारण त्यांनी अद्याप या हल्ल्यासंदर्भात काहीही विधान केलं नाही, असे म्हणत चंद्रशेखर यांनी योगी सरकारला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझाद