भारतातील सर्वात विचित्र ठिकाणांची नांव; ऐकलीत तर हसू आवरणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 12:56 IST2018-09-06T12:54:00+5:302018-09-06T12:56:26+5:30
मुंबईसह देशभरातील रेल्वे स्टेशन्सची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्यात आलं, तर सीएसटी स्टेशनचं नाव बदलून सीएसटीएम (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) असं ठेवलं गेलं.

भारतातील सर्वात विचित्र ठिकाणांची नांव; ऐकलीत तर हसू आवरणार नाही!
मुंबईसह देशभरातील रेल्वे स्टेशन्सची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्यात आलं, तर सीएसटी स्टेशनचं नाव बदलून सीएसटीएम (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) असं ठेवलं गेलं. तसंच काहीसं उत्तरप्रदेशमध्ये सुरू आहे. उत्तरप्रदेशमधील मुगलसराय आता दीन दयाल उपाध्याय नगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर सध्या इलाहाबाद स्टेशनचं नाव बदण्याची तयारी सुरू आहे. काही लोकं या नाव बदलण्याच्या निर्णांयांमुळे नाराज आहेत, तर काही लोकांना याचा काहीच फरक पडत नाही. कितीही नावं बदलली तरीदेखील लोकांच्या तोंडून आपण जुनीच नावं ऐकतो. पण आज आपण देशभरातील अशा काही गावांबाबत पाहणार आहोत ज्यांची नावं फार विचित्र असून ती बदलण्याचा विचार करणं गरजेचं आहे. या गावांची नावं ऐकताच तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात या गावांबाबत...
1. हिमाचल प्रदेशमधील 'पूह'

2. पंजाबमधील 'काला बकरा'

3. उत्तरप्रदेशमधील भैंसा गाव

4. झारखंडमधील दारू गाव
झारखंडमधील एका गावाचं नाव चक्क दारू आहे. या नावाचा उल्लेख अनेकदा विचित्र नावांच्या यादीमध्ये करण्यात येतो.
5. ओदिशामध्ये आहे सिंगापूर रोड
