शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

भारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 3:23 PM

प्राचीन काळापासूनच मानव नदी किनाऱ्याजवळ आपलं बस्तान बसवत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळतं. आताही अनेक अशी शहरं आहेत जी नदीच्या किनाऱ्यावरच वसलेली आहेत.

प्राचीन काळापासूनच मानव नदी किनाऱ्याजवळ आपलं बस्तान बसवत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळतं. आताही अनेक अशी शहरं आहेत जी नदीच्या किनाऱ्यावरच वसलेली आहेत. नदी म्हटलं की, ती डोंगरदऱ्यांमधून उगम पावते आणि आपला संपूर्ण प्रवास करून समुद्राला मिळते. जवळपास सर्वच नद्यांबाबत असचं होतं परंतु, तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशामध्ये एक अशी नदी आहे जी डोंगरांमध्ये उगम पावते पण समुद्राला जाऊन मिळत नाही. 

भारतातील या एकमेव नदीचं नाव आहे लूनी नदी. या नदीचा उगम राजस्थानातील अजमेर जिल्ह्यामध्ये 772 मीटर उंचावर असणाऱ्या नाग डोंगररांगामध्ये होतो. ही नदी अजमेरमध्ये उगम पावते आणि  दक्षिण-पश्चिम राजस्थान नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर, जालौर जिल्ह्यांमधून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या वाळवंटामध्ये लुप्त पावते. 

काही अंतरावर नदीचं पाणी होतं खारट

लूनी नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. राजस्थानमध्ये याची एकूण लांबी 330 किलोमीटर आहे. या नदीची खास गोष्ट अशी आहे की, बालोतरा म्हणजेच, बाडमेरच्या पुढे गेल्यानंतर या नदीचं पाणी खारट होतं. कारण वाळवंटामधून वाहत असताना वाळूमध्ये असलेले मीठाचे कण पाण्यामध्ये एकत्र होतात. त्यामुळे हे पाणी खारट होतं. एवढचं नाहीतर ही नदी कोणत्याही समुद्राला जाऊन मिलत नाहीतर वाळवंटामध्येच सुकून जाते. सुरुवातीला 100 किलोमीटरपर्यंत या नदीचं पाणी गोड असतं. हे पाणी राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे स्थानिक लोक या नदीची पूजा करतात. 

कधी जाणं योग्य? 

लूनी नदीचं सौंदर्य आणि निसर्गाचं अद्भूत दृश्य पाहण्याची उत्तम वेळ म्हणजे, पावसाळा. याव्यतिरिक्त येथे दरवर्षी मार्चमध्ये थार महोत्सवाचं आयोजन केलं जातं. राजस्थानचा जिल्हा बाडमेरची कला, संस्कृती आणि पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने या तीन दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवाला देशी आणि विदेशी पर्यटक आवर्जुन भेट देतात.

 येथे मोटर बाइकिंगचाही आनंद घेऊ शकता

येथे तुम्ही मुनाबाव बॉर्डर, किराडू मंदिर, मिठाचे पिरॅमिड्स, हल्देश्वरचे डोंगर यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तसेच तुम्ही येथे मोटर बाइकिंगचाही आनंद घेऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थानGujaratगुजरातIndiaभारत