शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

देशातला प्रवास स्वस्त की विदेशातला? उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन करताय, मग हे वाचाच!

By मनोज गडनीस | Published: March 17, 2024 6:51 AM

यंदा प्रवासाचे नियोजन करताना पहिल्यांदा तुमचे बजेट निश्चित करा.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

अलीकडच्या काळात विमान प्रवासाचे गगनाला भिडलेले दर लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन बहुतांश लोकांनी आतापासूनच करायला घेतले आहे. साधारणपणे नियोजन करताना लोक आपल्याला कुठे जायचे आहे, ते पहिले निश्चित करतात आणि त्यानंतर तेथील प्रवासाची तिकिटे, राहण्याची-फिरण्याची आदी व्यवस्था करतात. अर्थात, हे करताना या प्रवासासाठी बजेटही निश्चित झालेले असतेच. मात्र, यंदा प्रवासाचे नियोजन करताना पहिल्यांदा तुमचे बजेट निश्चित करा. कुठे प्रवास करायचा ते मात्र पहिल्या फटक्यात निश्चित करू नका. कारण तुमच्या बजेटमध्ये कदाचित देशातील एका पर्यटनस्थळाच्या तुलनेत परदेशातील एखाद्या उत्तम ठिकाणी तुम्हाला फिरण्याची संधी मिळू शकेल. ती कशी, त्याचाच हा सारांश...

परदेशी प्रवास स्वस्त आहे का?

सध्या भारतातील विमान प्रवास दर विचारात घेतले तर त्या तुलनेमध्ये पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या काही देशांतील विमान प्रवासाचे दर कमी आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक भारतीय तसेच परदेशी विमान कंपन्यांनी परदेशात प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्यातही भारतीय विमान कंपन्या सध्या परदेशातील सेवा वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांच्यातर्फे देखील घसघशीत सूट योजना जाहीर होत आहेत.

परदेशात भारतीयांची पसंती कोणत्या देशांना?

मलेशिया, मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ यासह जगातील लहानमोठ्या ६२ देशांत प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही. त्यामुळेच यापैकी बहुतांश देशात पर्यटनासाठी जाण्यास भारतीय लोक उत्सुक आहेत.

व्हिसापोटी प्रति माणसी किमान तीन हजार ते सात हजार रुपये आजवर खर्च होत होता. त्यामध्ये बचत होत असल्यामुळेच लोक  नमूद देशांना प्राधान्याने पसंती देत आहेत. याखेरीज, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँडस्, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, युके, अमेरिका येथे जाणाऱ्या भारतीयांची संख्या देखील लक्षणीय आहे.  

देशातील प्रवास का महागला?

२०१४ पासून आतापर्यंत सरत्या दहा वर्षांत देशामध्ये ७५ नवीन विमानतळांची उभारणी झाली आहे. विमान प्रवासाची सुविधा अधिकाधिक उपलब्ध झाल्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी लोकही विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स