शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर झाली सर्वात जास्त आक्रमणे, १७०० वर्ष जुना आहे हा किल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:51 IST

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात.

(Image Credit : TripAdvisor)

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात. यातीलच एक किल्ला म्हणजे राजस्थानच्या हनुमानगडमधील भाटनेर किल्ला. हा किल्ला फार जुना आणि शानदार आहे. हा किल्ला भारतातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. 

या किल्ल्याच्या चारही बाजूने मरूस्थलने वेढलेला हा किल्ला राजस्थानच्या उत्तर सीमेकडे आहे. १८०५ मध्ये बिकानेरचे राजा सूरत सिंह यांनी हा किल्ला भाटियांकडून जिंकला होता. मंगळवारच्या दिवशी मिळवलेल्या या विजयाला हनुमानासोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणाचं नाव हनुमानगड ठेवलं गेलं. भटनेर किल्ल्याची बनावट आणि मजबूती अशी होती की, याचा उल्लेख स्वत: तैमूर लंग ने त्याच्या पुस्तकात केला होता. 

किल्ल्याची बनावट

या किल्ल्याचं निर्माण २८५ मध्ये भाटी राजा भूपत यांनी केलं होतं. किल्ला पक्क्या वीटा आणि चुन्याच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. यात ५२ बुर्ज आहेत. दरबारापर्यंत घोड्यावरून जाण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच किल्ल्याच्या आत हनुमानाचं मंदिर आणि शिवाचे काही मंदिरे आहेत. सोबत शेर शाह सूरीची समाधी सुद्धा आहे. 

(Image Credit : MouthShut.com)

किल्ल्याची खासियत

राजस्थानच्या या किल्ल्यावर अकबरपासून ते पृथ्वीराज चौहाना यांनी शासन केलं. हनुमानगडचा हा किल्ला साधारण १७०० वर्ष जुना आहे. याच किल्ल्यावर सर्वात जास्त आक्रमणे झाली होती. परदेशी आक्रमणांचं सांगायचं तर महमूद गजनवी ने १००१ मध्ये भटनेर किल्ल्यावर ताबा मिळवला होता. १३व्या शतकात गुलाम वंशाचे शासक बलबनचा चुलत भाऊ शेर खां ने इथे राज्य केलं. आणि १३९८ मध्ये तैमूर लंगने हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर तैमूर म्हणाला होता की, यापेक्षा सुरक्षित किल्ला हिंदुस्थानात दुसरा नाही. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन