जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रविवारी रात्री समाजकंटकाने फोडल्याने सोमवारी पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. बाटलीभर पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागली, तर दुपारनंतर नळ कोरडे ...
शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. ...
विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करा ...
तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...
:जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. ...
तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये ...