लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी सकाळी साडे सात वाजता जे. बी. खोत शाळा, साईबाबा नगर, बोरिवली पश्चिम येथे सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे. ...
‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. ...
मतदान केंद्रांवर मोबाइलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी आहे. त्यामुळे केंद्रावर कोणीही मोबाइल चित्रीकरण करू नये. मात्र, केंद्रापासून शंभर मीटरच्या बाहेर सेल्फी काढता येणार आहे. ...