वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ...
क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत ...
घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...