वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. ...
रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. ...
वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन ...