वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एमआरआय’चे अवाजवी शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना परवडेल एवढे शुल्क आकारण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ...
आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई ...