दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली दिशा गिरीश डागा हिला विधिक्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. ...
शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. ...
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे. ...