देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे. ...
१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले ...
गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्र ...
गेल्या दोन दिवसांपासून हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोतूळ-राजूर रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.५ जून) रात्री पाणी आले. वटपौर्णिमेला मुळा नदी अनेक वर्षानंतर वाहती झाली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
मालेगाव शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाले. ...