जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
किस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. ...
वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी, निदर्शने, निषेध फेऱ्या काढून घटनेचा निषेध क ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये बुलडाण्यातील दोन जवानांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ...
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला आहे. ...