जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो ...
चीनने व्हिटो पावर वापरुन अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला ...
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. ...
पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. ...
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं ...